
करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा
पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असतानाही सायन येथील प्रतीक्षानगर परिसराला मात्र सांडपाण्याच्या कृत्रिम पुराचा सामना करावा लागतो आहे. मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्चुन केलेल्या कामांचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले असून, नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर तुंबल्याने स्थानिक नागरिक, रुग्ण आणि शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पालिकेला थेट तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
प्रभाग क्र. १७३ मधील प्रतीक्षानगर भागात गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद ठेवून पालिकेने करोडो रुपये खर्च करत नवी ड्रेनेज लाईन टाकली होती. पारिजात सोसायटी, कर्मवीर भाऊराव शाळा, मनोहर बाजार ते बहुमजली इमारत क्र. १९ व २०, तसेच नंदनवन सोसायटी (टी-५ ते टी-१९) या पट्टयात परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे. नालेसफाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवल्यामुळे नाले गाळाने तुडुंब भरले आहेत. रस्त्यांवर साचलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, झुरळे आणि उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने साथीच्या रोगांची भीती वाढली आहे.
मनसे सायन कोळीवाडा विधानसभा प्रभाग क्र. १७३ चे शाखाध्यक्ष लवू नर यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत या गंभीर स्थितीवर संताप व्यक्त केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका ढिम्म असल्याचा आरोप करत मनसेने प्रशासनासमोर प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. साचलेल्या घाण पाण्याचा तत्काळ निचरा करण्यासाठी परिसरात तत्काळ अतिरिक्त हाय-कॅपॅसिटी पंप बसवावेत. नव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन व नाल्यांमधील गाळाची तातडीने पाहणी करून सफाई करावी. विद्यार्थी व स्थानिकांचे हाल थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करावे. प्रशासनाने तात्काळ हालचाल करून हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालिकेविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे.
मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे
सोबतच सावित्रीबाई फुले नगर ते प्रतीक्षानगर बस डेपो दरम्यान सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र सर्व्हिस लाईनही उभारली.एवढा प्रचंड खर्च आणि वेळ वाया घालवूनही प्रत्यक्षात मात्र पाणी वाहून जाण्याऐवजी नाल्यातील गाळ आणि सांडपाणी थेट रस्त्यांवर आणि सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर तुंबले आहे.त्यामुळे पालिकेच्या या कामातील गुणवत्ता, कंत्राटदारांचे लागेबांधे आणि अधिकाऱ्यांचे नियोजन यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.