Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना सोबत का घेतले?; RSSच्या समन्वय बैठकीत फडणवीसांनी दिली उत्तरे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. अगदी बोटावर मोजण्याइतकेच त्यांचे उमेदवार निवडून आले. पण अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याचे आरएसएस ने टीका केली. अशातच लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि अजित पवारांची सोबत, या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी आरएसएसच्या समन्वय बैठकीत उत्तरे दिली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2024 | 10:17 AM
अजित पवारांना सोबत का घेतले?; RSSच्या समन्वय बैठकीत फडणवीसांनी दिली उत्तरे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला पराभव भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.  अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळेच भाजपला लोकसभेत मोठा फटका बसल्याचे आरएसएसकडून बोलले जात आहे. यावरून आरएसएसने अनेकदा अजित पवारांवरही टीका केली होती. याच मुद्द्यावरून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसच्या समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची बाजू मांडल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

– लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झालेला नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीकतही अजित पवारांना सोबत घेऊनच महायुती लढणार असल्याचे भाजपचे ठरले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

– लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले. पण आगामी काळात तिकीट वाटप करताना भाजप विचार करूनच तिकीटवाटप करणार आहे.

– विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आरएसएसनेही मैदानात उतरायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

– 2019 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष होता. पण एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर भाजप सत्ते येईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी देखील ही टक्केवारी पुरेशी नसल्याचे लक्षात आले. भाजपचा मुळ मतदार आणि संघ परिवारातील अनेकांचा विरोध असतानाही आम्ही अजित पवारांना सोबत घेतले.

– राज्यातील राजकीय परिस्थितीचे वास्तव पाहून अजित पवारांना आम्ही सोबत घेतले. पण लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांना सोबत घेतल्याने कोणताही फायदा झाला नसल्याचे लक्षात आले. पण लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला भाजपची 89 टक्के मते तर भाजपला शिंदे गटाची 88 टक्के मते ट्रान्सफर झाली. भाजप आणि अजित पवार यांच्यातील मतांची टक्केवारी 50 टक्क्यांपैक्षाही कमीच राहिली.

– एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सरकारमध्ये अनेक कामे करता आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी कामे झाली नव्हती ती पुन्हा सुरू करता आली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही महायुती म्हणून अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

– लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जिंकलेले इतर सर्व उमेदवार नवे होते. ज्या ठिकाणी जुन्या उमेदवारांना संधी दिली त्या जागांवर भाजपचा पराभवा झाला.  विरोधकांच्या खोट्या नॅरिटिव्हला संघाचा विचार पराभूत करू शकतो त्यामुळे आता संघानेही सक्रीयपणे मैदानात उतरावे अशी विनंती फडणवीसांनी केली आहे.

Web Title: Devendra fadwanis replied to rss about ajit pawar coming to power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 10:17 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • loksabha election 2024
  • Nagpur
  • RSS

संबंधित बातम्या

‘सर्वांना एकत्र घेऊन चालणं हीच संघाची विचारसरणी…हिंदू राष्ट्र’, RSS च्या 100 वर्षपूर्तीदरम्यान मोहन भागवतांचा संदेश
1

‘सर्वांना एकत्र घेऊन चालणं हीच संघाची विचारसरणी…हिंदू राष्ट्र’, RSS च्या 100 वर्षपूर्तीदरम्यान मोहन भागवतांचा संदेश

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ धक्का! संजय निषाद घेणार काडीमोड? ‘त्या’ विधानाने राजकारण तापले
2

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठ धक्का! संजय निषाद घेणार काडीमोड? ‘त्या’ विधानाने राजकारण तापले

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले
3

डिजिटल शिक्षण आणि ऑनलाइन शेती…, नागपूरचे हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि बुद्धिमान गाव ठरले

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
4

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.