
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित; सिंचन विभागाचे आश्वासन
दरम्यान, सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी दिलेल्या पत्रानुसार, धोम उजवा व डावा कालव्याचे नियोजन करण्यात आले असून उन्हाळी हंगामासाठी पाणी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, कालव्याचे आवर्तन नियमानुसार टप्प्याटप्प्याने सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भागातील तिसरे सिंचन आवर्तन २९ मार्च २०२६ रोजी बंद करण्यात आले असून, त्यानंतर उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन ६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार पाणी कोट्यानुसार देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार २ ते ३ सिंचन आवर्तने देण्याचे नियोजन आहे.
या पार्श्वभूमीवर समितीने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत नियोजित उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील काळातही पाणी व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहू नये, अन्यथा पुन्हा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित सिंचन अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
नियमबाह्य पाणी वाटपाचा विरोध: जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी धरणातून पाणी सोडल्यास उपोषण आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देते.
हक्काचे पाणी: लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणे हा मुख्य उद्देश आहे.
कालवा दुरुस्ती: धोमच्या डाव्या व उजव्या कालव्याची सफाई आणि दुरुस्ती (अस्तरीकरण) करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
आंदोलन व जलपूजन: मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आणि जलपूजनाद्वारे जनजागृती केली जात आहे.
पाणी चोरी: कालव्याचे कुलूप तोडून पाणी चोरीचे प्रकार घडल्याने, दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात