
iveagar, Gram Panchayat Election, Breaking News, Vijay Todankar, NCP,
Diveagar Gram Panchayat Election News: रायगड जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार ग्रामपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तोडणकर यांचा हा विजय सुनील तटकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दिवेआगारमधील या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने येथील जनतेले राष्ट्रवादीला नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Karjat News : रखरखत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई; पिण्य़ाच्या पाण्यासाठी होतायत हाल
या विजयानंतर तोडणकर यांनी थेट सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे. ” दिवेआगारमध्ये मनमानी, हुकूमशाही आणि जनतेला गृहीत धरण्याचे राजकारण खपवून घेणार नाही,” असं तोडणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीतही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दिवेआगार ग्रामपंचायतीतही सत्ता गमावल्याने तटकरे गटासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे.
दिवेआगार ही ११ सदस्यांची ग्रामपंचायत असून अनेक वर्षे येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीविरोधी गटाने ८ सदस्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देत ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर रिक्त झालेल्या ८ जागा आणि सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सरपंचपदासह ३ सदस्यपदे दिवेआगार विकास आघाडी (राष्ट्रवादी विरोधी गट) यांनी जिंकली. या निकालामुळे रायगडच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान पार पडले. या निवडणुका एकूण १८ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आल्या होत्या. या टप्प्यात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर आदी तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यामध्ये विशेषतः दिवेआगार ग्रामपंचायत चर्चेत राहिली, जिथे मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला.
काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य अपात्र ठरल्यामुळे किंवा पदे रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. दिवेआगारमध्ये तर ८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर सरपंचपदासह जागांसाठी निवडणूक झाली.
Karjat News : टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि शिलार धरणाला गावकऱ्यांना विरोध कायम
या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चांगला मतदानाचा टक्का नोंदवला गेला. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व यावर आधारित चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. एकूणच, २८ एप्रिलला झालेल्या या मतदानाने रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा दिल्याचे चित्र दिसत आहे.