
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होता होता राहिला! (Photo Credit- X)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपल्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून मुरबाडकडे रवाना झाले होते. दुपारी साधारण 3:30 वाजता त्यांचे हेलिकॉप्टर महालक्ष्मी रेसकोर्सवरून हवेत झेपावले. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच, जेव्हा हेलिकॉप्टर ऐरोली परिसराच्या वर पोहोचले, तेव्हा अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाची लक्षणे दिसू लागली.
Maharashtra: Office of Deputy Chief Minister Eknath Shinde- “Deputy Chief Minister Eknath Shinde’s helicopter went out of its scheduled route this afternoon. However, due to the pilot’s timely alertness and presence of mind, the helicopter was turned back and safely landed at the… pic.twitter.com/jCGMLzqBAq — ANI (@ANI) May 7, 2026
Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बडा नेता साथ सोडण्याच्या तयारीत
हेलिकॉप्टर ऐरोलीच्या आकाशात असताना समोरून वेगाने येणाऱ्या चक्रीवादळाचा अंदाज वैमानिकाला आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने त्वरित उपमुख्यमंत्र्यांना संभाव्य संकटाची कल्पना दिली. पुढे जाणे जीवघेणे ठरू शकते, असा सल्ला देत वैमानिकाने पुढे जाण्याऐवजी माघारी फिरण्याचा धाडसी निर्णय घेतला. वैमानिकाने विनाविलंब हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला आणि ते सुरक्षित दिशेला वळवले.
वैमानिकाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे काही मिनिटांतच हेलिकॉप्टर जुहू येथील ‘पवन हंस’ हेलिपॅडवर सुखरूप उतरले. उपमुख्यमंत्री कार्यालयाने (DCM Office) या घटनेला दुजोरा दिला असून, या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. वैमानिकाने दाखवलेल्या तत्परतेचे आणि कौशल्याचे सध्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समोर हवामानाची स्थिती अत्यंत बिघडलेली असल्याने हेलिकॉप्टरने आपला निर्धारित मार्ग बदलला होता. ऐरोलीच्या आकाशात वाऱ्याचा वेग आणि हवेचा दाब इतका वाढला होता की, जर प्रवास सुरू ठेवला असता तर हेलिकॉप्टरचे संतुलन बिघडून मोठा अपघात झाला असता. सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विमान मुंबईच्या दिशेने परत वळवण्यात आले. या थरारानंतर आता एकनाथ शिंदे रस्तेमार्गाने पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याचे समजते.