महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय उद्या याबाबत यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दम्यान कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय उद्यावर येऊन ठेपला असून अशातच अनेकजण तर्क वितर्क लढवीत आहेत. कोणाची सत्ता राहणार आणि कोण पायउतार होणार याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणं चुकीचं आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली.