Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचे ग्रहण सुटता सुटेना; लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतोय पाणी

कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत आहे हे कमी काय? म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा नुकसानभरपाई एक रकमी देण्यात येईल, अशी वल्गना करणाऱ्या सरकारने 10 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2023 | 11:54 AM
शेतकऱ्यांचे ग्रहण सुटता सुटेना; लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतोय पाणी
Follow Us
Close
Follow Us:

येवला : कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत आहे हे कमी काय? म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा नुकसानभरपाई एक रकमी देण्यात येईल, अशी वल्गना करणाऱ्या सरकारने 10 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागच्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना लाखो रूपये मिळवून देणारा टोमॅटो आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

किलोला 180 रुपयांप्रमाणे असलेल्या टोमॅटोच्या दराला आता कवडीमोल भाव आला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला 3 ते 5 रुपये किलो असा दर मिळत आहे. तर बाजार समितीत 20 किलोच्या कॅरेटला 50 रुपयांचा भाव मिळत आहे. यात 20 रुपये मजूरी 25 रुपये वाहतूक 3 रुपये आडत हमाली जात आहे. या सगळ्या खर्चाचा विचार केल्यास प्रती कॅरेट 2 रुपये उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडत आहे. या 2 रुपये उत्पन्नात घरातल्या सदस्यांचे कष्ट, बी- बियाण्याचा खर्च, रासायनिक खते इतर खर्च याचा विचार केल्यास शेती हा आतबट्टयाचा व्यवसाय असल्याची प्रचिती येते.

येवला कृषि उत्पन्न बाजार समितीत ०१ सप्टेंबरला जो टोमॅटो २०० रुपये कॅरेट विक्री होत होता तोच टोमॅटो ११ सप्टेंबरला ५० ते ७० रु दराने विकला जात होता अशीच काहीशी अवस्था कांद्याचीही झाली असून, येवला बाजार समितीत १० दिवसात कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले आहेत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कांद्याच्या निर्यात दराबाबत फेरविचार करण्याची मागणी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीवर अजूनही विचार झाल्याचे दिसत नाही.

सरकार लक्ष देईल का?

मागच्या महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सरासरी २६०० ते २८०० रुपये प्रतिकॅरेट दराने विकला गेलेला टॉमेटो सध्या ५० ते ७० रुपये प्रतिकॅरेटवर आला आहे. यामुळे टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. टोमॅटो कांद्याचे भाव वाढताच केंद्र सरकारने तत्परतेने टोमॅटो, कांदा आयात व निर्यात शुल्क वाढवत वाढणाऱ्या दरावर अंकूश आणला. परंतु आता टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना सरकार याकडे लक्ष देणार का? असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

Web Title: Farmers not getting good prices to tomato farmers is in tension nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2023 | 11:54 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Nashik News
  • Tomato Market

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.