Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान’; ओला दुष्काळ जाहीर करण्याची पटोलेंची मागणी

राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 23, 2025 | 11:09 AM
'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान'; ओला दुष्काळ जाहीर करण्याची पटोलेंची मागणी

'अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान'; ओला दुष्काळ जाहीर करण्याची पटोलेंची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पुरेशा मदतीअभावी बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर आणि केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली आहे. जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे आज शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु, सरकार नियमांच्या नावाखाली त्यांना मदत देण्यास टाळाटाळ करत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, आज सत्तेत असताना आता ते नियम सांगतात.

हेदेखील वाचा : New GST Rates : “राजा व्यापारी तिथली जनता भिकारी…; नाना पटोले यांचा नवीन GSTवरुन भाजपला टोला

दरम्यान, राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचं सरकार असूनही मदत का मिळत नाही?, शेतकरी, मजूर, बेरोजगार आणि सामान्यांसाठी हे सरकार फेल ठरले आहे. पण धनदांडग्यांसाठी हे सरकार धावतं. मग हे सरकार नक्की कुणाचे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

डबल इंजिन सरकार फेल

तसेच ते पुढे म्हणाले, ‘हे डबल इंजिनचे सरकार शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांसाठी फेल ठरले आहे. मात्र, हे सरकार धनदांडग्यांसाठी नेहमीच तत्पर असते’, असा आरोपही पटोले यांनी केला आहे.

जीएसटीवरून पटोलेंचा निशाणा

दुसरीकडे, केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे केवळ जीएसटीचे केवळ दोन स्लॅब असणार आहेत. हे नवीन स्लॅब लागू झाले असून यामध्ये केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन स्लॅब असणार आहेत. यामुळे अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. मात्र यापूर्वी मोदी सरकारकडून असलेल्या स्लॅबमुळे मोठे नुकसान झाले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Web Title: Farmers suffer huge losses due to excessive rainfall nana patole demands declaration of wet drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • Climate Change
  • Nana patole
  • Weather Update

संबंधित बातम्या

Air Pollution : दिल्ली-NCR पेक्षा जास्त प्रदूषित आहेत ‘ही’ शहरे; तुमच्या शहराचं आहे का नाव?
1

Air Pollution : दिल्ली-NCR पेक्षा जास्त प्रदूषित आहेत ‘ही’ शहरे; तुमच्या शहराचं आहे का नाव?

Maharashtra Rain Alert: ‘लक्ष्मीपूजना’ला वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह ‘या’ भागात केला कहर
2

Maharashtra Rain Alert: ‘लक्ष्मीपूजना’ला वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह ‘या’ भागात केला कहर

Air Quality in Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषण पुन्हा वाढतंय; प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर
3

Air Quality in Delhi : राजधानी दिल्लीत प्रदूषण पुन्हा वाढतंय; प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर

India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान
4

India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.