Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला आग, आगीच्या धूरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वारंवार छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना पाहता प्रशासनाने आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करीत यंत्रणा दक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 31, 2024 | 03:41 PM
केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पाला आग, आगीच्या धूरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाच्या कल्याण पश्चिमेतील बारावे घनकचरा प्रकल्पात आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या आगीत सुमारे 5 कोटी रुपयांची हानी झाली असावी अशी प्राथमिक माहिती मिळाली.

कल्याण डोंबिवली मनपाच्या बारावे येथील 100 मेट्रिक टन ड्राँय वेस्ट प्रकल्पात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. बारावे घनकचरा प्रकल्पात सुमारे 100 मेट्रिक टन सुका कचरा जमा केला जातो. यात कचऱ्याचे विलगीकरण करून काच, लोखंड, इतर धातू, ईलेक्ट्रॉनिक कचरा भंगार, प्लास्टिक वेगळे करीत उर्वरित सुका कचऱ्यापासून सुमारे 20 दिवसांची प्रक्रिया करून (आर डी एफ) तयार होते ते सिमेंट कंपन्याना पाठविले जाते. साधरण या प्रोसेस पध्दतीमुळे प्रकल्पात सुमारे 2 हजार टन कचरा प्रोसेससाठी पडून असतो.

रविवारी पहाटे 5 वा. लागलेल्या या आगीमुळे प्रकल्पातील मशिनरी, जळली असल्याने या आगीमुळे सुमारे साडेचार ते 5 कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती अधिकारी सूत्राकडून मिळाली आहे. यापूर्वी हि बारावे घनकचरा प्रकल्पात लागलेल्या आगीत सुमारे दोन ते तीन करोडचे नुकसान झाले होते. त्यानंतर सुमारे ५ महिन्याच्या कालवधीनंतर प्लांट कार्यन्वित झाला होता. वारंवार छोट्या मोठ्या आग लागण्याच्या घटना पाहता प्रशासनाने आग लागणार नाही यासाठी प्रयत्न करीत यंत्रणा दक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

बारावे घनकचरा प्रकल्पाच्या आगीच्या घटनामुळे लगतचे रहिवासी आगीच्या धुराच्या त्रासाने संताप व्यक्त करीत असून हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी जोर धरु पाहत आहे. या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. यामध्ये बारावे ट्रान्स्फर स्टेशन प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने आगीच्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. येथे नेहेमी आग लागत असते. याचा अर्थ प्रशासनाचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे व नियमांचे उल्लंघन करून येथे कचरा साठवला जातो. तेथे कोणतेही प्रकारचे विलगीकरण होत नाही. हा प्रकल्प नागरिकांच्या आरोग्यासाठी शाप ठरत आहे तरी हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवली मनपाचे प्रमुख अग्निशमन आधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता कल्याण डोंबिवली मनपाच्या ७ अग्निशमन बंबाच्या गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सुमारे आठ तासाच्या अथ्थक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण आणित धुराचे लोट कमी करण्याचे काम करीत आग विझवली असल्याचे सांगितले.

Web Title: Fire at kdmcs twelfth solid waste plant health of citizens in danger due to fire fumes maharashtra government kalyan dombivli muncipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 03:41 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल या तारखेपर्यंत सादर करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला
2

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !
3

Kalyan : कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर
4

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.