रेवदंडा : माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला येणार्या संकटाला सामोरे जाऊन पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझा मच्छीमार बांधव मच्छीमार व्यवसायातून देशाला देतो. छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी रेवदंडा येथील कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली. मच्छीमार बांधवाना डिझेलचा परतावा यापुढे कधीही थकीत राहणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यावर आणि केंद्रात खासदार म्हणून निवडून गेल्यावर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबविल्या जातील असा शब्दही तटकरे यांनी दिला. अलिबाग मतदार संघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आम. महेंद्र दळवी यांनी आणल्याचेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. शेकापक्ष आमदार जयंत पाटील कालच शरद पवार साहेबांना सोबत घेऊन मोर्बा येथे आले होते. पंरतू त्या सभेला गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडयात कोळी बांधवानी केली असल्याचा टोला तटकरे यांनी लगावला. यावेळी जयंत पाटील तुम्ही नितिमत्ता, राजकारण, अक्कल आम्हाला शिकवू नका असे देखील खडेबोल सुनावताच आत्मपरिक्षण करा. तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात? यावर विचार न करता सुनिल तटकरे यांचेवर टिका का करता? असा सवाल तटकरे यांनी केला.
या मतदार संघात 4 जुनला घडयाला गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घडयाल या चिन्हावर तुम्हाला बटन दाबायचे आहे, उदयाच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
रायगडमधील जनमानसात सुनिल तटकरे यांचे स्थान अढळ आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ते निवडून येणारच असा शब्द आमदार महेंद्र दळवी यांनी दिला. कोळी समाज व आगरी बांधव तटकरेच्या पांठिशी उभा राहणार असून त्याचे मतपेटीतून प्रत्यंतर दिसेल असेही दळवी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार तटकरे यांना निवडून दयायचे आहे. रायगडचा कोळी समाज प्रामाणिकपणे पाठीशी उभा राहील असा शब्द विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी दिला. एलईडी पर्सनेट मच्छीमारीमुळे कोळी बांधवावर अन्याय होत आहे. याकडे आमदार रमेश पाटील यांनी लक्ष्य वेधले.
रेवदंडा मोठेबंदर येथील भंडारी समाज सभागृहात कोळी समाज महासंघाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांचे प्रमुख उपस्थितीसह विधान परिषद आमदार आणि कोळी समाज नेते आमदार रमेश पाटील, आमदार महेंद्रशेठ दळवी, अॅड चेतन पाटील, तालुका अध्यक्ष अनंता गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे, ॠषीकांत भगत, जुलेखा तांडेल, प्रतिक्षा राउत, बाळाशेठ तेलंगे,माजी नगरसेवक प्रकाश बोबडी, कोळी महासंघ रायगड अध्यक्ष ज्ञानेश्वर टिवळेकर, कार्याध्यक्ष संजय हवालदार, उपाध्यक्ष ताराचंद कोंडे, रेवदंडा ग्रा.प. उपसरपंच मंदाताई बळी, माणिक बळी,आशिष भट,भगिरथ पाटील,आदी मान्यवर मंडळी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिरथ पाटील, कोळी महासंघाचे मनोगत अॅड चेतन पाटील यांनी व्यक्त केले तर आमदार रमेश पाटील, आम. महेंद्रशेठ दळवी व लोकसभा उमेदवार सुनिल तटकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी कोळी समाज बांधव व भगिनी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.