
दुपारी ३ वाजता कार्तिक हे अन्य गावकऱ्यांसह गावाबाहेरील बेरडीपार तलावावर विसर्जनासाठी गेले होते. विसर्जनाची प्रक्रिया सुरू असताना अचानक तोल गेल्याने ते तलावातील खोल पाण्यात पडले. सोबत असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. मात्र, तलावातील गाळ आणि पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर काढण्यास काहीसा विलंब झाला.
घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिस व आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले. कार्तिक यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. कार्तिक यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. गावातील कर्तव्यनिष्ठ जवानाच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रविवारी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.