Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain : तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत; सततच्या पावसामुळे मोठं संकट

तासगाव तालुका आणि परिसरातील द्राक्षबागांवर यंदाच्या अनियमित आणि सततच्या पावसाचे सावट पसरले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर महिन्यातही कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2025 | 06:29 PM
तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत; सततच्या पावसामुळे मोठं संकट

तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत; सततच्या पावसामुळे मोठं संकट

Follow Us
Follow Us:
  • तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंतेत
  • उत्पादकांमध्ये अनिश्चिततेचे सावट
  • सततच्या पावसामुळे उद्पादन घटण्याचा धोका
तासगाव/मिलिंद पोळ : तासगाव तालुका आणि परिसरातील द्राक्षबागांवर यंदाच्या अनियमित आणि सततच्या पावसाचे सावट पसरले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर महिन्यातही कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. या हवामानामुळे बागांची वाढ, काड्यांची पक्वता आणि घड पडण्याच्या प्रक्रियेलाच मोठा फटका बसला आहे.

तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व आणि जत या भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथील अनेक बागांमध्ये मार्च व एप्रिल महिन्यात खरड छाटणी करण्यात आली होती. मार्च महिन्यात छाटणी केलेल्या बागांना काही प्रमाणात सुमारे ४५-५० दिवस चांगले ऊन मिळाल्याने काड्या पक्व होण्यास थोडीशी मदत झाली आहे. मात्र, एप्रिलमध्ये खरड छाटणी झालेल्या बागांवर मात्र पावसाचे थेट संकट ओढावले आहे. या बागांना आवश्यक असलेले ६० दिवसांचे कडक ऊन मिळाले नाही. परिणामी या बागांमधील काड्या वरून जरी तपकिरी व पक्व दिसत असल्या तरी त्यांच्या आतील विकास पूर्ण न झाल्याने घड पडण्याचे प्रमाण कमी होईल, अशी भीती उत्पादकांना वाटते आहे.

तासगाव तालुक्यातील काही धाडसी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व फळ छाटणी घेतली आहे. परंतु आता सुरू झालेला पाऊस पुन्हा वाढल्याने या बागांवर रोगराईचे संकट ओढावले आहे. फुलोऱ्यातील नुकसान, घडांची कुज, पानांवरील बुरशी, द्राक्षबागेतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे असंतुलन यामुळे हंगामपूर्व छाटणी केलेल्या बागावर संकट दिसू लागले आहे.

ऊन-पावसाचा पिकावर थेट परिणाम

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक सध्या कधी ऊन पडते? या प्रश्नाने अक्षरशः थांबले आहेत. द्राक्ष घडांचे स्वरूप, वजन आणि टिकाऊपणा यावर ऊन-पावसाचा थेट परिणाम होत असल्याने, ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या मुख्य फळ छाटणीवर हवामान निर्णायक ठरणार आहे.

हवामानात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता

द्राक्षबागांच्या अवस्थेकडे पाहता, शेतकऱ्यांच्या आशा अजून पूर्णतः मावळलेल्या नाहीत; मात्र पावसाचा अतिरेक थांबला नाही, तर तासगाव तालुक्याला यंदा ‘पावसाने मारलेला द्राक्ष हंगाम’ असे वर्णन ऐकावे लागेल, अशी भीती द्राक्ष पट्ट्यातून व्यक्त होत आहे. दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर हवामानात आणखी काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासाकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणखीन चिंताग्रस्त झाला आहे.

तालुक्यातील काही भागात पावसामुळे जमिनीत ओल वाढल्याने द्राक्ष वेलीच्या मुळीवर परिणाम आणि इतर बुरशीजन्य रोगांचा प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त कीडनाशके व फवारणी खर्च करावा लागणार आहे. पाऊस थांबला नाही तर यंदा उत्पादनात किमान ३० ते ४० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. -सिद्धनाथ जाधव, द्राक्ष उत्पादक व सल्लागार, सावळज

Web Title: Grape growers in tasgaon taluka are worried due to continuous rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Grapes

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
1

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्ट

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.