Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात गेली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 21, 2025 | 07:57 AM
छत्रपती संभाजीनगरसह विभागात १० मंडळात अतिवृष्टी

छत्रपती संभाजीनगरसह विभागात १० मंडळात अतिवृष्टी

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. एकीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु असताना दुसरीकडे अतिवृष्टीचा कहर सुरुच आहे. आता परतीचा पाऊस सुरु झाला आहे. गुरुवार ते शुक्रवार दरम्यान 24 तासांत विभागातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवार ते शनिवार या 24 तासात पुन्हा विभागातील दहा मंडळात अतिवृष्टीचे नोंद झाली आहे. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील 3 मंडळांसह धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे पिके पाण्यात गेली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. विभागात अतिवृष्टीचे सत्र सुरूच आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मागील आठवडाभरापासून विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे, पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच दुसरीकडे पडणाऱ्या दमदार पावसामुळे बाधित क्षेत्रात भरच पडत असल्याचे चित्र आहे.

हेदेखील वाचा : IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…

दरम्यान, विभागीय आयुक्तालय प्रशासनाकडून प्राप्त अहवालानुसार, गेल्या 24 तासात मराठवाड्यात ८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २.७ मिमी, जालना ५.३ मिमी, बीड जिल्ह्यात ६.६, लातूर १२.४ मिमी, धाराशिव ७.४ मिमी, नांदेड ७.४ मिमी. पाऊस झाला.

संभाजीनगरच्या तीन मंडळात बॅटिंग

शुक्रवार ते शनिवार या 24 तासांत देखील मुसळधार पावसाने संभाजीनगरसह विभागाला झोडपून काढले. शुक्रवारी सायंकाळी पाचनंतर वातावरणात बदल होऊन सुरुवातीला रिमझिम व नंतर अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. या हंगामातील मोठ्या पावसापैकी हा एक असल्याचे बोलले जात आहे.

दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद

संभाजीनगर जिल्ह्यातील ३ मंडळांसह विभागातील एकूण दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद केली आहे. या २४ तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३. ५ मिमी, जालना १०. ५, बीड ८. २, लातूर १३. ५, धाराशिव १३. ४. नांदेड ३.८, परभणी ७. ८ तर हिंगोली जिल्ह्यात २१. ४ मिमी असे विभागात एकूण ११. ४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळाली आहे.

Web Title: Heavy rains hit many parts of the maharashtra and heavy rainfall in 10 mandals including chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 07:57 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Climate Change
  • Heavy Rain
  • Heavy Rainfall
  • Maharashtra Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: ‘या’ शहरात ऊन-पावसाचा खेळ कायम राहणार; पुढील तीन दिवस यलो अलर्ट
1

Maharashtra Rain Alert: ‘या’ शहरात ऊन-पावसाचा खेळ कायम राहणार; पुढील तीन दिवस यलो अलर्ट

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
2

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…
3

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस
4

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.