Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक, ‘या’ मुलांना सहकार्य करणाऱ्या बालमित्रांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

ऊसतोड कामगार ऊन, पाऊस थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडविण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 16, 2025 | 03:32 PM
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: जालना जिल्ह्यातील हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील मुलांसाठी सॅक्रेड आणि स्वराज या दोन संस्था गेल्या ८ वर्षांपासून कुटुंब आणि समाजाधारीत काळजी आणि संगोपन व्यवस्था हा उपक्रम राबवीत आहेत. या कामात त्यांना युनिसेफ मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य लाभले आहे. या उपक्रमात स्थलांतर करणारी कुटुंबे त्यांच्या मुलांना आज्जी आजोबा किंवा जवळचे नातेवाईक यांच्याकडे सोपवून जातात. यामुळे त्या मुलांचे शिक्षण अखंडितपणे चालू राहते व स्थलांतराच्या ठिकाणी निर्माण होणारे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्नही उपस्थित होत नाहीत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर सडकून टीका; म्हणाले, “भाजप देश आणि धर्म…”

या मुलांच्या शिक्षण, पोषण, सुरक्षा इत्यादी बाबींकडे त्या त्या गावातील तरुण स्वयंसेवक जातीने लक्ष पुरवतात. त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर किंवा भरायच्या आधी ते मुलांचे खेळ वर्ग आणि अभ्यास वर्ग घेतात. हे स्वयंसेवक बालमित्र या नावाने ओळखले जातात. गावातील लोकच यांची निवड करतात. यांना सॅक्रेड आणि स्वराज यांच्या तर्फे प्रशिक्षण दिले जाते. आज बालमित्रांच्या प्रयत्नांनी जालना जिल्ह्यातील २६० गावांमध्ये जवळजवळ ६००० मुले स्थलांतराच्या काळात मागे राहत आहेत. या बालमित्रांचा गुणगौरव सोहळा १५ मे रोजी जालना जिल्ह्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी काही निवडक बालमित्रांनी आपले विचार व्यक्त केले. त्यापैकी काहीजण बालमित्र म्हणून काम करीत असतांना मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेऊन आज सरपंच, अंगणवाडी ताई, मुख्याध्यापक, मास्टर ट्रेनर अश्या विविध पदांवर कार्यरत आहेत. या सोहळ्यामुळे आपल्या कष्टाचे चीज झाले आहे आणि हे सेवाभावी काम करण्यास अधिकच प्रोत्साहन मिळाले आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बालमित्रांच्या या मेळाव्याला संबोधित करतांना मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले “ आज प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये अनेक समित्या, कार्यकर्ते आणि लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत. पण बालकांची सुरक्षा, शिक्षण आणि त्याच बरोबर सामाजिक जागृती आणि युवक युवतींची क्षमता बांधणी यात तुम्ही करत असलेले कार्य केवळ अतुलनीय आहे.

सामाजिक सेवेचा हा वसा बालमित्रांच्या एका तुकडी कडून पुढच्या तुकडीकडे हस्तांतर होत आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेले स्थलांतराचे दुष्टचक्र या येणाऱ्या पिढीत तरी भंग होईल अशी आशा निर्माण झाली आहे.” त्याच बरोबर आजपर्यंत या उपक्रमाला त्यांच्याकडून मिळत असलेले संवेदनशील आणि सक्रीय पाठबळ या पुढेही मिळत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी खास करून बाल मैत्रिणींना बाल विवाहाच्या सापळ्यात न अडकता प्रथम आपले शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्यांनी या कामामध्ये आरोग्य, शिक्षण आणि जि.म.बा. यासारख्या विभागांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची विनंती केली. युनिसेफ च्या राज्य बाल संरक्षण तज्ञ अल्पा वोरा यांनी असे प्रतिपादन केले की बालकांची सुरक्षा आणि त्यांचे योग्य पालनपोषण यावरच समाजाची संवेदनशीलता आणि ताकद दिसून येते. सॅक्रेड आणि स्वराज या संस्था आणि असंख्य बाल मित्रांचे अविरत प्रयत्न यांच्या द्वारे जालना जिल्ह्यातील हजारो मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा याची काळजी त्यांच्या घराच्या उबदार वातावरणातच राहून घेतली जात आहे.

या प्रसंगी आरोग्य, शिक्षण इत्यादी विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच बरोबर जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून जवळजवळ ४५० बालमित्र या कार्यक्रमात सहभागी झाले. सॅक्रेडचे सचिव रवि केळगावकर आणि स्वराज चे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ यांनी सूत्र संचालन केले. त्याच बरोबर या दोन ही संस्थांचे अधिकारी आणि असंख्य बालमित्र यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वप्रथम मा. जिल्हाधिकारी यांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर युनिसेफ त्यानंतर अश्या तरुणांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.

Cyclone Shakti Alert: पावसासंदर्भात मोठी अपडेट! ‘शक्ती’ वादळामुळे मुंबई, कोकणात वादळी पाऊस, या भागात रेड अलर्ट

Web Title: Honor given by the jalna district collector to the child friends who support the children of sugarcane worker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Jalna
  • maharashtra
  • Sugarcane

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.