Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी कोकणातील पाचही जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली! खासदार नारायण राणेंचा घणाघात

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक बदल झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 16, 2024 | 11:40 AM
खासदार नारायण राणे

खासदार नारायण राणे

Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ : कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांची १५ जून रोजी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या विजयानंतर या कोकणातून शिवसेना पूर्णपणे संपवली. मी आडवे आले तर साफ करतो. आता या ठिकाणी कोणाला शिरू देणार नसल्याचा टोला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी विरोधकांना लगावत या निवडणुकीनंतर आम्ही जागृत झालो असून आता राज्यातही आमचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आता यापुढे सर्व निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचाच विजय निश्चित आहे, असाही विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजू राऊळ, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संदीप कुडतरकर, रणजित देसाई, अस्मिता बांदेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, रुपेश कानडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात माझा झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी निमित्त मात्र आहे असे राणे यांनी सांगत विजयासाठी प्रयत्न करणारे मतदार, महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार त्यांनी मानले. तसेच पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन असेही राणे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे ही आभार त्यांनी मानले. माझ्या विजयासाठी माझे मुलगे निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनी दिवस-रात्र दोघांनी फार मेहनत घेतली. माझ्या पत्नीने अनेक सभा, बैठका केल्या या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे.

पुढे ते म्हणाले की, निवडणुकीत विरोधकांनी अनेक विविध प्रयत्न माझ्या विरोधात केले. अनेक डायलॉग केले होते. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी तर सांगितले होते की, आता आमचा विजय हलका झाला आहे. परंतु,आता मी विजयी होत त्यांना हलके केले हे समजले असेल, त्यांनाही दीर्घायुष्य लाभो असाही टोला त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना लगावला. मतदारांनी मला विजयी केल्यानंतर आता माझा आत्मविश्वास अधिक वाढला असून या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मी कार्य करीत राहणार आहे. आता रत्नागिरीचे पाच प्रश्न मी हाती घेतले असून यामध्ये रत्नागिरीतील महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी मुख्यमंत्री आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. तसेच येथील पाणी, रोजगार, विमानतळ वाहतूक, पर्यटन आणि चिपळूणमधील पूरस्थिती हे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम काम करणार आहे असे राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गमधील सीवर्ल्ड, रिफायनरी तसेच कोकण किनारपट्टीवरील टॉय ट्रेन हे प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी सांगितले की, याबाबत भाष्य करायचं नाही आहे पक्ष नेतृत्व महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी जी देईल ती जबाबदारी घेऊ असे सांगत मंत्रिपदाबाबत त्यांनी बोलणे टाळले. कोकणातील मुस्लिम बांधव आमच्यासोबत असून आमच्या सोबतच राहणार, मात्र मातोश्रीमध्ये मुस्लिम लोकांबद्दल काय शब्द बोलला जातो तो शब्द मला माहित आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Web Title: I expelled shivsena from all five districts of konkan mp narayan rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • BJP
  • Kudal
  • MP Narayan Rane

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.