
Mohan Bhagwat
भागवत यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “संघ संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणाचे पूर्ण समर्थन करतो आणि समाजातील वंचित घटकांमध्ये त्याची गरज नाहीशी होईपर्यंत ते चालू राहिले पाहिजे. अखंड भारतावर विश्वास व्यक्त करताना ते – म्हणाले की, २०४७ पर्यंत अखंड भारताचा उदय निश्चित आहे. ब्रिटिश २०० -वर्षात भारताचे विभाजन करू शकले नाहीत, म्हणूनच आजही जे भारताचे – विभाजन करण्याचा विचार करत आहेत, पण ते स्वतःच विखुरतील.”
बांगलादेशचा संदर्भ देत ते म्हणाले की, “बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत. जर त्यांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला तर जगभरातील हिंदू त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतील, असपण जागरूक राहण्याची गरज आहे. संघाच्या भविष्याबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ” सरसंघचालकासाठी कोणतीही निवडणूक नाही, सरसंघचालक होण्यासाठी ब्राह्मण असणे ही अनिवार्य पात्रता नाही आणि अनुसुचित जाती (एससी) किंवा अनुसूचित जमातीमधील (एसटी) असणे ही अपात्रता नाही, तथापि, सरसंघचालक नेहमीच हिंदू असेल, मग ती कोणत्याही जातीचा असो, जेव्हा संधाची स्थापना झाली तेव्हा त्याची सुरुवात ब्राह्मणबहुल भागात झाली होती, त्यामुळे सुरुवातीच्या काळात बहुतेक पदाधिकारी ब्राह्मण होते. परंतु आता संघाचा विस्तार झाला आहे. पुढील सरसंघचालक कोण असेल याचा निर्णय उपलब्ध सर्वोत्तम उमेदवार’ या आधारे घेतला जाईल.
म्हणाले की, भ्रष्टाचार हा व्यवस्थेतील दोष नाही तर मानवी मूल्यांमधील दोष आहे. चाणक्य यांचे उद्धरण देताना ते म्हणाले की, मासा पाणी पितो तेव्हा तो शोधणे जसे कठीण असते, तसेच सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार शोवणे देखील तितकेच कठीण असते.
‘भाषा आणि तंत्रज्ञानाबाबत संघाची भूमिका डॉ. भागवत म्हणाले की, इंग्रजी ही भारतीय भाषा नाही. जिये इंग्रजीशिवाय काम करणे अशक्य आहे तिथे आम्ही तिचा वापर करू शकतो, परंतु संधाचे अंतर्गत काम फक्त भारतीय भाषामध्येच केले जाईल.
एआय वापराबद्दल इशारा डॉ. भागवत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला की, कृत्रिम बुद्धिमता (एआय) आणि नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत असले तरी, त्यांचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की, रोजगारावर परिणाम होऊ नये, यंत्रांद्वारे उत्पादनऐवजी ‘लोकांद्वारे उत्पादन ‘वर भर दिला.