
डीआरटीबी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ! बीपीएएलएम उपचार, तंत्रज्ञानामुळे मुंबई पालिकेला यश
क्षयरोगाच्या (टीबी) निर्मूलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत प्रभावी पावले उचलली असून, औषध-प्रतिरोधक (डीआरटीबी) रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. पालिकेच्या माहितीनुसार हा दर आता ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाढ नोंदवली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ‘येस, वी कॅन एन्ड टीबी! या घोषवाक्याखाली मोहिमेला वेग देण्यात आला आहे. २०२५ मध्ये मुंबईत ५४,३९० क्षयरोग रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी ४८,८३५ रुग्ण मुंबईतील आहेत. यामध्ये ४४ टक्के रुग्ण ‘एक्स्ट्रा पल्मनरी ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के डीआरटीबी रुग्ण आहेत.(फोटो सौजन्य – istock)
राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या
निदानासाठी पालिकेने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढवला आहे. सध्या ४५ सीबीएनएएटी आणि ३४ टू नेंट यंत्रांद्वारे मोफत तपासणी केली जाते. २०२५ मध्ये सुमारे २ लाख मॉलिक्यूलर चाचण्या करण्यात आल्या. ‘पॅथो डिटेक्ट’ या नव्या यंत्रामुळे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे अचूक निदान शक्य होत आहे.डीआरटीबी रुग्णांसाठी ‘बीपाल्म’ उपचार पद्धती सुरू करण्यात आली असून, उपचार कालावधी आता केवळ सहा महिन्यांवर आला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून, त्यापैकी अनेकांनी उपचार पूर्ण केले आहेत.
दुर्गम भागातील रुग्ण शोधण्यासाठी ‘हँडहेल्ड एक्स-रे मशीनचा वापर केला जात असून, ७४ हजारांहून अधिक संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. ‘डिफरन्शिएटेड टीबी केअर’ अंतर्गत उच्च जोखमीच्या रुग्णांना विशेष सेवा दिली जात आहे, पालिकेकडून ‘निक्षय मित्र’ योजनेद्वारे रुग्णांना पोषण आहार दिला जात असून, जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन घटणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे टीबीसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. टीबी झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. मुंबईमध्ये ५४,३९०टीबी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १०९३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.