Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत आहे. नदीतील प्रदूषणामुळे स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताण पडत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 05, 2026 | 05:29 PM
विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

Follow Us
Close
Follow Us:

आळंदीच्या वैभवाला प्रदूषणाचे ग्रहण
आधी मृत मासे अन् पांढरा फेस
श्रद्धेच्या इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा

पिंपरी: तीर्थक्षेत्र आळंदीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना ताजी असतानाच, आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रदूषणाची भीषणता आणि प्रशासकीय अनास्था

गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीच्या पात्रात रसायनांचे थर साचल्याने पांढरा शुभ्र फेस पाहायला मिळत आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात प्रदूषित पाण्यामुळे प्राणवायूची पातळी खालावल्याने हजारो मासे मृत पावले होते. नदीकाठी मृतावस्थेत पडलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. मात्र, एवढी भीषण परिस्थिती ओढवूनही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कारवाईऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.

नदीचे पात्र अरुंद; राडा-रोड्याचे साम्राज्य

नदी स्वच्छ करण्याऐवजी पात्रात मोठ्या प्रमाणात राडा-रोडा आणि कचरा टाकला जात आहे. पुलांच्या बांधकामावेळी पडलेला मलबा अद्याप काढण्यात आलेला नाही, परिणामी नदीचे पात्र अरुंद झाले आहे. तसेच पूर नियंत्रण रेषेत (Blue Line) राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध बांधकामांकडे महसूल आणि पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

‘परदेशात बंदी अन् भारतीय कायद्यांचा दुरुपयोग करून…’; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, सर्व कारखान्यांची…

विकासाच्या नावाखाली केवळ ‘कागदी’ घोडे
“नदी स्वच्छ न करता नदीकाठचा विकास कशासाठी?” असा रोकडा सवाल आता नागरिक विचारत आहेत. जय गणेश मंदिर परिसर, श्री स्वामी महाराज घाट आणि स्मशानभूमी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ नदीकाठच्या सुशोभीकरणावर भर दिला जात असून, प्रत्यक्ष पाणी शुद्धीकरणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. श्री स्वामी महाराज घाटाजवळील भुयारी मार्ग (सब-वे) अद्याप वापरासाठी खुला न केल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे झालेल्या अपघातात एका वारकरी महिलेचा मृत्यू होऊनही प्रशासन ढिम्म असल्याची टीका होत आहे.

जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण

इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत आहे. नदीतील प्रदूषणामुळे स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताण पडत असून, पाणी साठवण बंधाऱ्यांच्या गळतीमुळे पाणी टंचाईचे संकटही गडद होत आहे.

जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे

नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देऊन या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ठोस कृती आराखडा राबवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Indrayani river caught grip of pollution water foamy white in alandi pcmc water marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • alandi
  • Indrayani River
  • PCMC News
  • pollution

संबंधित बातम्या

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला
1

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय
2

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
3

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौरांचा नदीपात्रात उतरून पुढाकार; प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल
4

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.