Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या राज्यपाल महोदयांनी चक्क इतिहासच सांगितला चुकीचा; म्हणाले, ‘जंजिरा बाजीराव पेशव्यांनी जिंकला’

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. कारण राज्यपाल बैस यांनी जंजिरा किल्ल्याबाबत बोलताना एक विधान केले. 'बाजीराव पेशव्यांनी जंजिरा सिद्धी जोहरच्या ताब्यातून मुक्त केला', असे त्यांनी म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2023 | 02:35 PM
नव्या राज्यपाल महोदयांनी चक्क इतिहासच सांगितला चुकीचा; म्हणाले, ‘जंजिरा बाजीराव पेशव्यांनी जिंकला’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे. कारण राज्यपाल बैस यांनी जंजिरा किल्ल्याबाबत बोलताना एक विधान केले. ‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा सिद्धी जोहरच्या ताब्यातून मुक्त केला’, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल रमेश बैस एका कार्यक्रमात बोलत होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धी जौहरच्या तावडीतून मुक्त केला. तर बाजीराव पेशवे यांचे वीरतेला आपण विसरू शकत नाही. त्यांनी अनेक युद्ध जिंकले आणि गुजरातमध्येही मराठा साम्राज्य स्थापन केले. त्यांनी जंजिराला सिद्धी जौहरच्या ताब्यातून मुक्त केले. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे की, त्यांनी देशाला नेतृत्व दिले आहे. महाराष्ट्रातील वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी देशाच्या स्वातंत्रलढ्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले’.

इतिहास अभ्यासक म्हणतात…

याबाबत इतिहास अभ्यासक विश्वास पाटील म्हणाले की, ‘जंजिरा हा किल्ला अजिंक्य राहिला आहे. तो स्वराज्यात कधीही आला नाही, शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी झाले. सिद्धीच्या ताब्यातून बाजीराव पेशव्यांनी कधीही हा किल्ला जिंकला नाही. हा किल्ला नेहमी अजिंक्य राहिला आहे. शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही, म्हणून त्यांनी बाजूला पद्मदुर्ग बांधला. संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी पाण्यात सेतू बांधून प्रयत्न केला. मात्र, तेव्हा औरंगजेब मिनवायला आल्यामुळे त्यांना तो किल्ला सोडून द्यावा लागला’.

330 वर्षे किल्ला अजिंक्य

‘बाजीराव पेशव्यांनी जंजिरा किल्ला हा सिद्धीच्या तावडीतून मुक्त केला. मात्र, हा किल्ला 1617 ते 1947 अशी 330 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगितला म्हणून राज्यपाल बैस चर्चेत आले आहेत.

Web Title: Janjira fort won by bajirao peshwa says governor ramesh bais nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2023 | 02:35 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • Janjira Fort
  • maharashtra
  • political news
  • ramesh bais

संबंधित बातम्या

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल
1

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी
2

‘वृद्ध झालेल्या मंत्र्यांना घरी पाठवा, अन्…’; आमदार संतोष बांगर यांची मागणी

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा
3

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Modi Cabinet Expansion : 20 जूनपूर्वी होणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? ‘हे’ दोन मंत्री देणार राजीनामा
4

Modi Cabinet Expansion : 20 जूनपूर्वी होणार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? ‘हे’ दोन मंत्री देणार राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.