Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्पावरुन जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हणाले, “बाटाचा बूट…”

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज 1 लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असे अनेक गंभीर सवाल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 29, 2024 | 04:36 PM
अर्थसंकल्पावरुन जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हणाले, “बाटाचा बूट…”
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प मांडला. यानंतर मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज 1 लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असे अनेक गंभीर सवाल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले.

जयंत पाटील यांनी विधीमंडळामध्ये बोलताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “अंतरिम अर्थसंकल्प हा गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा 1 लाख कोटी रुपयांपेक्षा वाढीव रकमेचा होता. राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प हा 17 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा मांडला. तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर जून महिन्यात या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांची 44 हजार कोटींची भर घातली. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही 55 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर आता काल-परवा 8 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या. अर्थसंकल्प मांडताना तो तुटीचा होता. तरीदेखील राज्य सरकारने 1 लाख कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या,” ही बाब प्रकाशझोतात आणून देत जयंत पाटील यांनी राज्य सरकारला जाब विचारला.

तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले, “आम्ही सत्तेत असताना अजित पवारांनी 2022 सालचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. आता 40 आमदार सत्तेत सामील झाले आहेत. सत्तते येताना या आमदारांनी काही अटी टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरवणी मागण्यांचं शेपूट वाढत गेलं. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीची तरतूद या नव्या अर्थसंकल्पात आहे का? 94 हजार कोटींची वित्तीय तूट 99 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वित्तीय तूट ही 99 हजार 288 कोटी रुपये आहे. म्हणजे ही तूट एक लाख कोटींच्या वरच आहे. थोडी तडजोड करून दुरूस्ती केलेली दिसत आहे. आपण बाटाच्या दुकानात गेल्यावर बुटाची किंमत ही 999 रुपयांच्या स्वरुपात असते. मला दुकानात गेल्यावर प्रश्न पडतो की हा बूट 990 रुपयांना का नाही. तो 999 रुपयांनाच का असतो. लोकांना वाटतं की तो बुट 1000 रुपयांना नाही, तो 999 रुपयांना आहे, तोच घेऊया. अगदी तशाच पद्धतीने वित्तीय तुटीचा आकडा दाखवण्यात आला,” अशी स्पष्ट भूमिका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मांडली.

Web Title: Jayant patil aggressive on ncp leader dcm ajit pawar for budget provisions political news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 04:36 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Budget 2024
  • jayant patil
  • mahaarshtra
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय
1

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
2

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने
3

Baramati Politics: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या; बारामतीत महायुती-आघाडी आमने-सामने

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
4

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.