
Karjat News
कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते.मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते,तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठया नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते.त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत.हे लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडा डिसेंबर 2025 मध्ये तयार करण्यात आला आहे.यावर्षी कर्जत तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या या पाणीटंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.
या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरचे माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता.यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे.शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती,त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी 13 टँकर मंजूर झाले असून त्या टँकर मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही 14 हजार लिटर एवढी आहे.त्या टँकर मधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकर ने पाणी पुरवठा केला जाणार आहे.आज तालुक्यातील सात गावे आणि 13 वाड्या यांना टँकर मधून पाणी दिले जात आहे.तालुक्यातील पेज आणि उल्हास नदी मधून पाणी उचलले जात आहे.
कर्जत तालुक्यातील आशाणे, कोषाने,पळसदरी,पाथरज, मोगरज,खानंद,धामणी या सात गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.तर किरवली ठाकूरवाडी,सावरवाडी ठाकूरवाडी,पळसदरी ठाकूरवाडी,वर्णे ठाकूरवाडी, चिमटे वाडी,जांभूळ वाडी, झुगरेवाडी, किरवली, पेटारवाडी,लोभेवाडी, पिंगळस,फणसवाडी,भक्तची वाडी, सराईवाडी,पाच खडकवाडी, मोहपाडा, मेचकरवाडी, धोत्रेवाडी आणि बणाचीवाडी या 21 वाड्या मध्ये शासकीय टँकर मधून पाणी पुरवठा केला जात आहे.
Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना