6: 30 वाजता संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका लवकरच पोहचेल असे सांगण्यात आले. त्यानंतर एक तास होऊन देखील ॲम्बुलन्स आले नाही,त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा 108 ला कॉल केला असता. ॲम्बुलन्स ड्रायव्हर कॉल वर बोलताना अलिबागवरून आलो आहे, त्यामुळे तात्काळ येऊ शकणार नाही.मला येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स घेऊन येण्यास वेळ लागेल अशी उत्तरे देण्यात आली. किमान आठ ते साडेआठ वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेल अशी उत्तर देऊन कॉल कट करण्यात आला. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती ढासळली.नातेवाईक यांनी डॉक्टरांना रुग्णवाहिकाबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली.मात्र काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाची स्थिती बघून सर्वत्र भिती निर्माण झाली.
ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे पेशंटच्या जीवाशी खेळण्याचे काम सरकारचे अधिपत्याखाली चालवली जाणारी 108 नंबरचे वाहन वेळेवर पोहचत नव्हते.त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांनी पेशंटच्या जीवाला काही बरं वाईट झाली तर याची जबाबदार 108 ॲम्बुलन्स घेणार का? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात आला.त्यानंतर ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील डॉक्टर बाबासो कालेल यांना कॉल केला असता, त्यांच्याकडून तात्काळ ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली.मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास तीन तासांचा वेळ लागल्याने ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे ॲम्बुलन्स बद्दल निर्माण झालेला प्रश्न पुन्हा समोर आला.तर कशेळे परिसर आदिवासी बहुल असून मोठ्या संख्येने आदिवासी परिसर असल्यामुळे गोरगरिबांची उपचाराची सोय हॉस्पिटलमध्ये होत असते परंतु पेशंटला पुढील उपचारासाठी इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवण्यात सांगितल्यानंतर अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्यामुळे पेशंटची गैरसोय होताना दिसत आहे. पेशंटची ही गैरसोय कधी संपणार? आणि नवीन रुग्णवाहिका कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?






