Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: वरुणराजाची प्रतीक्षा लांबली! करमाळ्यात खरीप पिकांना फटका; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार

Solapur News: करमाळा तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग पिके संकटात आली आहेत. पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 24, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News: करमाळा तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पेरणी होऊन दीड ते दोन महिने उलटले आहेत. सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस नसतानाही शेतकऱ्यांनी उसनवारी करून खते, बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करत पेरणी केली. मात्र, आता पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत.

सुरुवातीला काही भागांत रिमझिम पाऊस झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर या पिकांनी चांगली उभारी घेतली होती. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

पावसाच्या आशेवर फिरले पाणी

एखाद्या नक्षत्रात तरी दमदार पाऊस होऊन पिकांना जीवदान मिळेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, दिवसेंदिवस पावसाची प्रतीक्षा वाढत असल्याने ही आशाही आता मावळू लागली आहे. खरीप हंगामातील उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे.

उत्पादन खर्च वाढला, उत्पन्नाची हमी नाही

खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या वाढत्या दरामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यात मजुरी, ट्रॅक्टर, मशागत तसेच अन्य यंत्रसामग्रीच्या खर्चाची भर पडली आहे. हजारो रुपये खर्च करून पिकांची लागवड केली असताना आता पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत.

खर्च दिवसेंदिवस वाढत असताना उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसल्याने “शेती करायची तरी कशी?” असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी

पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीच्या मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही शेती परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या पावसाचा थांगपत्ता नसल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.

“पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतीच्या मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही शेती परवडत नाही. सध्या पावसाचा थांगपत्ता नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Palghar Eco Sensitive Zone : वाडा, मोखाड्यातील जमिनींना नव्या पाबंदी? केंद्राचा निर्णय; पालघरमध्ये 126 गावे इको-सेन्सिटिव्ह कक्षेत

मुलांचे शिक्षण, रब्बी हंगामाचा खर्च कसा भागवणार?

खरीप पिके हातातून गेल्यास कर्जाची परतफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि आगामी रब्बी हंगामाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. खरीप हंगामावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित पावसाअभावी बिघडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाचे पडसाद ग्रामीण बाजारपेठेवरही उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील पैसा कमी झाल्याने ग्रामीण अर्थचक्रावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

Web Title: Karmala rain crisis kharif crops soybean tur farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • farmer
  • rain
  • Solapur News

संबंधित बातम्या

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
1

Tea Price Hike: चहाच्या घोटालाही महागाईची उकळी; १० वर्षांनी चहा महागला, आता मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल
2

AI Video: धक्कादायक! आभासी दुनियेचा विळखा घट्ट; ‘AI’च्या भुलभुलैय्यात चिमुकल्यांची दिशाभूल

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच
3

अपुऱ्या पावसाचे सणासुदीच्या बाजारपेठेवर सावट! व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा; व्यापारवृद्धीच्या आशा पावसावरच

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
4

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.