
Kolhapur News
यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथे झालेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कोलाम वस्तीतीला जोरदार तडाका बसला.दरम्यान, शुक्रवारी गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. राज्यात मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली असली, तरी मुंबईकरांना पावसाचा आनंद लुटता येणार नाही. दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत
कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस
घाट माध्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांना गुरुवारी पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर आजरा, चंदगड, गडहिंग्लज, संकेश्वरसह परिसरात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सकल भागात पाणी झाल्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली होती. तर शेत शिवारांमध्ये पाणी साचले होते.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत काही भागात पावसाच्या तुरळक सरी सुरुव होत्या. या पावसाने काही घरांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. गारगोटी परिसरात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; सहा जखमी
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव येथे वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब वीज वाहिन्यांवर कोसळून अपघात झाला. सोलर खांब कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून थेट लग्न मंडपावर पडल्या. त्यामुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. तर विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले. सोलर खांब अंगावर पडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले