
kolhapur
शहरात सध्या २० प्रभाग आहेत, यातील काही प्रभागात पहाटे साडेपाचलाच तर काही प्रभागात दुपारच्या वेळेत कचरा उठाव करणारी वाहने येतात. एक तर पहाटे उठलेले नसतात किंवा दुपारी कामाला गेलेले असतात. परिणामी त्यांचा कचरा तसाच साचत जातो आणि नागरिक बेजबाबदारपणे हा कचरा रस्त्यावर फेकून देतात. अनेक लोकांनी कचरा टाकल्याने ठिकठिकाणी पुन्हा कोंडाळे निर्माण होऊ लागले आहेत. याला जबाबदार नागरिक की कचरा उठाव करणारे, याचे उत्तर महापालिकेनेच द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोल्हापुरात सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य रस्ते व दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व रस्त्यांची स्वच्छता केली जाईल. तसेच ओला कचरा, सुका कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या याचे वर्गीकरण करण्यासाठी वेगवेगळे ड्रम दिले जातील, तसेच ज्या भागात कोडाळे निर्माण झालेले आहेत ते त्वरित उचलण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देणार आहे. असं कोल्हापुरचे महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं आहे.