सातारा/ Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वागढवण्यात आला आहे. कोयनेतून विसर्ग वाढवण्यात आल्याने सांगली-कोल्हापुरात महापुरचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना नदीपात्रात विसर्ग वाढवला असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगली – कोल्हापूरला त्यामुळे महारपुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोयनेतून विसर्ग वाढवला
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ९ फुटांवरून ११ फुटापर्यंत उघडून ७८,४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ८०,५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पाटणच्या कोयना पाणलोट क्षेत्रात प्रचंड अतिवृष्टी होत आहे. कोयना नदीला जोडणाऱ्या उपनद्या, ओढून आले भरभरून वाहून कोयना नदी पात्रात मिळत आहेत त्या वाढलेल्या पाण्याबरोबरच कोयना धरणातून सोडलेली पाणी नदीपात्रात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. यामुळे कोयना नदीवर असलेला मुळगाव पुलाबरोबरच, निसरे नावडी दरम्यान बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठच्या गावातील नियंत्रण पूररेषेवर पाणी पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवडाभरात अतिवृष्टी बरोबर प्रचंड थंड वारा वाहत आहे. कराड पाटण रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साठले आहे. कोकणात जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. प्रमुख बाजारपेठात थंडी पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेती पडन, शेती उद्योग अडचणीत आला आहे.