
येरवडा : लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध समस्यांची झगडत आहे. शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांना विविध समस्येला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने संबंधित शाळेला वाली कोण? हा मुख्य प्रश्न पालकांना पडला असून, या परिसराचा पालिकेत सहा वर्षे समावेश करून ही शाळेला पालिका शिक्षण मंडळात अध्यापही समावेश न केल्याने विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना देखील विविध अडचणींचा सामना करण्याची वेळ येत आहे.
लोहगाव भागाचा सहा वर्षापूर्वी ग्रामपंचायत मध्ये समावेश असताना व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदांच्या वतीने लोहगावच्या मुख्य चौकात मुलांची व मुलींची १ व २ अशी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. मुलींच्या शाळेत जवळपास ४०० ते साडेतीनशे विद्यार्थिनी येथील शाळेत शिक्षण घेण्याचा लाभ घेत आहे. मुलींच्या शाळेत सध्या ११ शिक्षक कार्यरत असून येथे ४ शिक्षकांची कमतरता आहे विद्यार्थिनींच्या पटा नुसार तेथे १५ शिक्षकांची आवश्यकता आहे. तर शाळा क्रमांक एक मुलांची याठिकाणी मुलांची संख्या साडेतीनशे च्या आसपास आहे. या संख्येनुसार अकरा शिक्षकांची आवश्यकता आहे परंतु तेथे केवळ पाचच शिक्षक उपलब्ध असल्याने मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्यावर भार पडत असल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने व शिक्षकच हजर नसल्याने यासंदर्भात पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त करून मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा मुख्य प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.
चार-पाच वर्षापासून मुख्याध्यापकच नाही
गेल्या चार-पाच वर्षांपासून शाळा क्रमांक एक मुलांची येथे कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्यामुळे त्या चार-पाच शिक्षकांपैकी ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापकाचा कारभार सांभाळावा लागत आहे, त्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांना मुलांना शिकवायचे की शाळेचा कारभार सांभाळायचा हा मोठा प्रश्न शिक्षकांपुढे पडला आहे.
विशेष म्हणजे ५ ते ६ वर्षापूर्वी लोहगाव परिसराचा महापालिकेत सहा वर्षे उलटून देखील शाळेचा पालिका शिक्षण मंडळात समावेश करण्यात न असल्याने शाळेची अवस्था तळ्यात की विद्यार्थ्यांची झाली आहे. विशेष म्हणजे शाळेला मैदानच नसल्याने असलेले मैदान ही तुटपुंजे असल्याने व त्यामध्ये ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहण्याची वेळ येत असून जेवणाकरितास बैठक व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात शाळेच्या वरंड्यात नाईलाजास्तव बसण्याची वेळ येत असल्याने पालकांमध्ये याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेच्या आवारात साफसफाई करण्याकरिता सुरक्षा रक्षकाला कर्मचाऱ्यांची नेमणूक जरी करण्यात असली असली तरी पण ते वेळेत शाळेत हजर राहत नसल्याने शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचून व साचलेल्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून विद्यार्थ्यांना डेंग्यू,मलेरिया यासारख्या महसभांयकर आजारांची साथ पसरते की, काय अशी धास्ती पालकांना लागून राहिली आहे. तर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी बेशिनाची सुविधा करण्यात आली आहे. पण त्यामध्ये नेहमीच सांडपाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात वाहनतळ नसल्याने शिक्षकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना शाळेच्या आवारातच वाहने लावण्याची वेळ येत आहे. त्यामुळे संबंधित शाळेला वाली कोण ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत असून विविध समस्यांना विळख्यात अडकलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यासह शिक्षकांचा मुख्य असलेल्या ह्या समस्येतून सुटका होणार का? हा मुख्य प्रश्न उपस्थित होऊन संबंधित लोहगाव भागाचा पालिकेत समावेश करून उपयोग काय असा सवाल लोहगावकरकडून करण्यात येत आहे.