
लांजा तालुका होणार टंचाईमुक्त; ४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा आराखडा मंजूर
४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा टंचाई आराखडा मंजूर
तालुक्यातील गावांच्या टँकरमुक्तीवर देणार भर
कायमस्वरूपी दूर करणार पाणीटंचाई
लांजा: लांजा पंचायत समितीचा ४२ गावे आणि ९६ बाड्यांचा समावेश असलेला ४ कोटी २५ लाख ८३ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून याद्वारे लांजा तालुका पाणी टंचाईमुक्त करण्याचा निर्धार आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.
या आराखड्यात तालुक्यातील कोंडने, धनगरवादी कोथरी भववाडी, धनगरवाडी, डोलमवाडी, बंडेवाडी व सुतारवाडी, प्रभानवल्ली गणेश सोरवाडी, देवभे बौद्धकडी व माळवाडी, वनमुळे, धनगरवाडी व तैलीवाडी, आगचे देखील मोरेवाडी, आरगांव कुणनेव्हडी कणगली, तिखेवाडी, कोंड सोनारवाडी, कोर मांडवकरवाडी, बोलें पठारवाडी, कुर्गे, पड्यारवाडी, मानेवाडी व पड़शीवाडी, खावडी, पिरुकेवाडी गुरववाडी, गवाणे येथील बौद्धवाडी, चव्हाणवाडी, कर्नावलेवाडी, मावळवाडी, गजीवाडी व म्हेतरवाडी, गोविज बौध्दवाडी, घायलेवाडी, गोसावीवाडी व धामणवाडी, तेलीवाडी जावडे, गवाणकरवाडी व जाह्मणवाडी, पालू, करवणेवाडी, पुनस येथील पुनस कोंड, बेनी बुटुक चिंचवाडी व लोहारवाडी, भड़े वरपाटवाडी, भांबेड बौद्धयाडी, लक्ष्मीनगर, तेलीवाडी, गुरववाडी नं.१. पवारवाडी, देलवाडी, कुडेवाडी, गांगणवाडी, गोसावी बाईवाडी, पेठदेव, हमवाडी, गुरववाडी नं.२. कोळेवाडी बेटकरवाडी, रिगणे गांगोवाडी व हांदवाडी, रूण धनगरवाडी व बौद्धवाडी, वाकेड, विलवाडे सुतारवाड़ी व खामकरवाडी, वाडगाव हसोळ बौद्धमाती व कोडवाडी, वाघणगाव, जठारवाडी व पवारवाडी, शिपोशी बोरीवले, शिरवली येथील चरची भागवाडी, कोटकरवाडी, बौद्धबड धनगरवाडी व केळवली, हर्दखळे पालडी धनगरवाडी, खोरनिनको मुसळेवाडी व भट्टीचीवाडी, इसकाली सुतारवाडी, कुरकुंच पेथील खालची गुरववाडी, मुवारवाडी, गुरवाडी व तापेकरवाड़ी या कामांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.
तालुक्यातील गावांच्या टँकरमुक्तीवर देणार भर
लांजा पंचायत समितीने तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केरला असून. ४२ गावे आणि ९६ पाड्यांचा समावेश असलेल्या आराखड्यात संभाव्य कराग्रस्त टेकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, विहिरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे करून टँकरमुक्त गावे करण्यावर भर देण्यात आहे.
Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करताना संभाव्य टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी त्या गाव बाडीची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर कशी करता येईल.