Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी ४१ अंश तापमानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. म्हसवड येथे झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 13, 2026 | 05:24 PM
माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

Follow Us
Close
Follow Us:
  • पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही
  • म्हसवडमध्ये महिलांचा मोठा सहभाग
  • आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे रक्तदान
म्हसवड : माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताविरोधात आज म्हसवड येथे शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तब्बल ४० ते ४१ अंश तापमान असतानाही शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण माण-खटाव तालुक्यात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सदर मोर्चा म्हसवड येथील सिद्धनाथ रथगृहापासून सुरू होऊन सिद्धनाथ मंदिर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना, एस.टी. स्टँड मार्गे मा. अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना निवेदन सादर केले.

या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना करचे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “देशात चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्टॅम्प घोटाळा झाले; त्याचप्रमाणे माण-खटावमध्ये आता पाणी घोटाळा झाला आहे. काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जातात, मात्र माण तालुक्याच्या पूर्व भागाला एकही आवर्तन दिले जात नाही. हा सरळ सरळ अन्याय आणि दुजाभाव आहे.”

“जेव्हा विरोधक टीका करतात तेव्हा १४० कोटी जनता मोदीजींसोबत येते,” मोदींच्या आवाहनावरून शिंदेची विरोधकांवर टीका

त्यांनी पुढे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चा उल्लेख करत सवाल उपस्थित केला की, “कायद्यासमोर सर्व समान असताना आमच्यावर अन्याय का? आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित का ठेवले जाते?” करचे यांनी माणच्या उत्तर भागातील ‘जिहे-कटापूर’ योजनेचाही मुद्दा उपस्थित केला. “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात त्या भागाला पाणी सोडण्यात आले; मात्र निवडणूक संपताच पाणी बंद झाले. आज त्या भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मग जिहे-कटापूरचे पाणी का सोडले जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच माणच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी देताना मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत, “वारंवार तक्रारी करूनही अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे या पाणी चोरीला कोणाचे संरक्षण आहे?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या आंदोलनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या

१ )पाणी घोटाळा करणाऱ्या व पाणी चोरीला संरक्षण देणाऱ्या संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
२ ) माण-खटाव तालुक्यात शासनाच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप तातडीने सुरू करावे.
३ )शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
४ )नुकसानभरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी.अशा प्रमुख मागण्या या आंदोलनकर्त्यांनी करीत या आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. रक्तदानावेळी बोलताना महेश करचे म्हणाले, “शेतकऱ्यांची पोरं देशाच्या सीमेवर रक्त सांडत आहेत आणि शेतकरी उन्हातान्हात घाम गाळून देश जगवत आहे. भले आमचे रक्त घ्या, पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या.”

“पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा देत त्यांनी पुढे सांगितले की, “प्रसंगी न्यायालयाची पायरी चढू आणि तिथेही न्याय मिळाला नाही तर हा लढा आणखी उग्र करू. शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा भल्या-भल्या सत्ता कोसळतात, हा इतिहास आहे.”

मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तीव्र उष्णतेतही महिला आणि शेतकरी मोठ्या निर्धाराने तहसील कार्यालयावर धडकले. या आंदोलनामुळे माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

Web Title: Maan khatav farmers water protest mhaswad blood donation agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
1

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
2

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता
3

Nashik News : तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
4

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.