Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र काँग्रेसचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2025 | 01:15 PM
महाराष्ट्र काँग्रेसचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; शेतकऱ्यांसाठी केली 'ही' मोठी मागणी

महाराष्ट्र काँग्रेसचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; शेतकऱ्यांसाठी केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

लातुरातील शेती पिकांना मोठा फटका

लातूर जिल्ह्यातील मांजरा आणि तेरणा नदी परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. या पावसामुळं शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. फक्त तीन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. पिकांची स्थिती बिकट आहे. शेतातील पाणी अद्यापही न ओसरण्यामुळे सोयाबीनची मुळे कुजत आहेत. पिकं पिवळी पडली असून उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यावर कोणताही ठोस उपाय नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. पाऊस थांबून दोन दिवस झाले असले तरी शेतातलं पाणी न ओसरण्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत.. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे.

Web Title: Maharashtra congress leader harshvardhan sapkal has sent a letter to chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal
  • Rain News

संबंधित बातम्या

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून
1

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
2

टाकळीवाडीच्या माळावर भेसळ खव्याचे केंद्र, नागरिकांच्या आरोग्याला धोका; अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
3

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान; संकटातील बळीराजा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
4

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.