
वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती. या विधानामुळे प्रकरणाची व्याप्ती आता मंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळापर्यंत पोहोचली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील मंत्र्यांचे कार्यालय तपासासाठी सील केले आहे. कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय अशा प्रकारे सील करण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या कारवाईनंतर शुक्रवारी झिरवाळ यांनी दिल्लीतून प्रतिक्रिया दिली होती की, “माझा संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन.” मात्र, आज शनिवार (१४ फेब्रुवारी) सकाळपासून त्यांचा फोन ‘नॉटरिचेबल’ असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ACB ने अटक केलेल्या अन्न आणि औषध प्रसासनातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगे याने एका मेडिकलचा निंलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील ३५ हजारांची लाच घेताना तो रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे. ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले.
Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप
यावरुन झिरवळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.