Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार? ‘ही’ आहेत दोन नाव, वर्षा गायकवाडांचे मोठे विधान

महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे बघा, भाजपमद्ये महिलांना मंत्रिपदही दिले  जात नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 03, 2024 | 02:50 PM
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार? ‘ही’ आहेत दोन नाव, वर्षा गायकवाडांचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई: राज्य विधानसभा निवडणकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघीडतील जागावाटपाटच्या चर्चा अद्यापही सुरू आहेत.  पण राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण असेल, हा चर्चेचा विषय़ ठरत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे नाव समोर येत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे प्रतिदावेही सुरू आहेत.

अशातच एका काँग्रेस खासदाराने  मोठे विधान केले आहे.  महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाव समोर आले आहे. दुसरीकडे आतापर्यत राज्याला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, अशाही चर्चा अनेकदा होत असतात.  राज्याच्या विधानसभा निवड़णुका तोंडावर आलेल्या असताना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यातच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे.

हेही वाचा: शरीरासाठी अँटीऑक्सिडंट फार महत्वाचे; ‘या’ आहाराचे करा सेवन, सदैव निरोगी राहाल

खासदार वर्षा गायकवाड  यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिला मुख्यमंंत्री होऊ शकते का? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांना विचारला असता वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे, सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे रश्मी ठाकरे आहेत.आमच्या पक्षाकडेही महिला नेक्या आहेत. पण त्याबाबतचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतात.

महाराष्ट्राची पुरोगामी आणि प्रगत राज्य म्हणून ओळख आहे. महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची महिला मुख्यमंत्री झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींनाही आम्ही संघर्ष करताना पाहिलं आहे. पण भाजपकडे बघा, भाजपमद्ये महिलांना मंत्रिपदही दिले  जात नाही. पक्षाचे अध्यक्षपद दिले जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे आता आपण 50 टक्के आरक्षणही लागू केलं असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा:  भाजपला धक्का ! ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Web Title: Maharashtra will get a woman chief minister big statement of congress mp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 10:02 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.