Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जींचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. अशातचं आता महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जीं यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2022 | 05:37 PM
महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जींचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. महाराष्ट्राचा हा राजकीय खेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंकल्याचे मानले जात आहे. अशातचं आता महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर ममता बनर्जीं यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मूच्या नावाची घोषणा केली असती तर समर्थनावर चर्चा होऊ शकली असती, परंतु आता काहीही शक्य नाही. कोलकाता येथे इस्कॉनच्या रथयात्रेच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या घटनेनंतर द्रौपदी मुर्मू जिंकण्याची शक्यता जास्त आहे. आता विरोधक जो निर्णय घेईल, तो मी पाळेन. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या प्रश्‍नावर ममता यांनी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने विरोधकांशी केलेल्या चर्चेचा संदर्भ देत ममता म्हणाल्या की, भाजपने यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ते एका आदिवासी महिलेला मैदानात उतरवत आहेत हे आम्हाला आधीच माहीत असते तर आम्हीही प्रयत्न केले असते. व्यापक हितासाठी आम्ही 17 विरोधी पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ शकलो असतो. सहमतीच्या आधारावर ते होऊ शकले असते. भाजपला फक्त आमची सूचना जाणून घ्यायची होती, त्यांनी त्यांची सूचना दिली नाही.

सर्व पक्षांशी चर्चा करून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आल्याचे ममतांनी स्पष्ट केले. आता निर्णय बदलायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊनच बदलावा लागेल. ममता यांच्या या विधानामागे बंगालमधील एससी-एसटी मतदार कार्ड असल्याचे मानले जात आहे. या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर चौधरी यांनी ममता यांच्यावर हल्लाबोल करत मुख्यमंत्री संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

[read_also content=”फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत तृप्ती देसाई यांची प्रतिक्रीया, म्हणाल्या… https://www.navarashtra.com/maharashtra/trupti-desais-reaction-regarding-fadnavis-deputy-chief-minister-post-said-nrdm-299803.html”]

दरम्यान दुसरीकडे, सीपीआय(एम) नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपसोबत सेटिंग करण्यात आली आहे. कारण ईडी आणि सीबीआय जे मागे आहेत. या मुद्द्यावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले की, तृणमूलचा भाजपला विरोध आणि यशवंत सिन्हा यांचे नुकतेच विधान अत्यंत दुःखद आहे. तृणमूल नेते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना बाहेरचे म्हणत राहतात. आम्ही सर्वांनी सहमती देण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मुर्मू यांचा विजय निश्चित आहे हे त्यांना माहीत आहे, त्यामुळेच त्या अशा गोष्टी बोलत आहेत.

Web Title: Mamata banerjees big statement after the coup in maharashtra said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 05:37 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • mamta banerjee
  • narendra modi
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
2

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
3

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.