Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तापणार! जरांगे पाटलांकडून ‘या’ तारखेपासून साखळी उपोषण जाहीर

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2025 | 01:43 PM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

Follow Us
Close
Follow Us:

जालना :  राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीकडे आरक्षणाची मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकारकडे ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावी अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये देखील जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते. आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाची घोषणा केली आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जरांगे पाटील यांनी 25 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु केले होते. पुन्हा एकदा त्याच मागणीसह जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले होते. मात्र सहा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी त्यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार नाही असे जाहीर केले होते. मात्र आता शांत देखील बसणार नाही, असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला होता.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मराठा समाजाने केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी न केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाज बेमुदत साखळी उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. अंतरवाली सराटीतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून, याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाचीही पाहणी करणार असून मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

दिल्लीचा निकालच्या अपडेट घ्या एका क्लिकवर

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतलं. मात्र, तेरा चौदा दिवस झाले फडणवीसांनी एकाही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली नाहीये. याउलट मराठ्यांच्या पोरावरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवत आहेत. त्यामुळं मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्य भर फडणवीसांना गादीला शिवू देणार नाही. फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये, बेकार होईल, असा इशाराही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

मराठा आरक्षणामुळे महायुती चिंता वाढली

मागील दीड ते दोन वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. सर्व मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्याचबरोबर आंदोलन काळामध्ये मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे. यासाठी त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता मात्र निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे.

Web Title: Manoj jarange patil declares chain hunger strike for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Mahayuti Governmet
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.