Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ, तोंडसुर गावातील हजारो महिलांचा पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा

रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यातच आता म्हसळा तालुक्यातील तोंडसुर गावातील हजारो महिलांनी 3 किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2025 | 08:33 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

‘पाणी हेच जीवन’ हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलं आणि वाचलं आहे. खरंतर, पाणी नसेल तर आपले जीवन चालू शकणार नाही. पाण्याचा योग्य वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच सरकार नेहमी नागरिकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करतं. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात अशा अनेक गावात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत. पाणी मिळवण्यासाठी त्या गावांमध्ये संघर्ष सुरू आहे. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाला ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते.

ग्लोबल कोकण महोत्सव गाजला ! 2 लाखांहून अधिक लोकांचा प्रतिसाद, कोकणच्या उद्योग आणि संस्कृतीला नवी चालना!

रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ लागण्यास सुरवात झाली असून म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे या गावातील पाण्याने मार्च महिन्यातच विहिरीचा तळ गाठला असून नद्या ओस पडल्या आहेत. १३.५ कोटी रुपयांची तोंडसूरे नळ पाणीुरवठा योजना बारगळ्याने ल्याने योजनेचे तीन -तेरा वाजले असून ४ ग्रामपंचायती मधील ९ वाड्याना याचा फटका बसला आहे.

पाभरे धरणातून पाणी पुरवठा होत असलेली जुनी नळपाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात व होळीच्या सणात पाणी संकट ओढवल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. १ हंडा पिण्याच्या पाण्यासठी एक किलोमीटर ची पायपीट करावी लागत असल्याने आज तोंडसूरे ग्रामपंचायत हद्दीतील ३ वाड्यातील १००० पेक्षा जास्त महिला व पूरुष ३ किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयांवर शासना विरोधात घोषणा देत हंडा मोर्चा काढला.

Mumbai : बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई

पाणीपुरवठा कार्यालयातील अभियंता यांना निवेदन देत या मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदवला असून २: दिवसात टँकर ने पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. उप अभियंत जे.यु.फुलपगारे यांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महादेव पाटिल, तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, सरपंच सुरेश महाडिक,तीन वाडी अध्यक्ष वामन नाक्ती, सचिव सुदर्शन जंगम, सदस्य प्रकाश लोणशिकर, मोरेश्वर जंगम, अनिल जंगम, गाव अध्यक्ष गजानन जंगम,रिला पवार, सुनिल शेडगे,उपसरपंच प्रीती पवार, उमेश नाक्ती, गोपाळ भायदे, समीर काळोखे आदि लोकं उपस्थित होते.

Web Title: Many villages in raigad district are facing water shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad News
  • Water problem

संबंधित बातम्या

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन
1

Raigad News: विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकत्यांना आवाहन

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
2

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
3

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप
4

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.