मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; बीड दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
जालना : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठं आंदोलन उभे केले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टमध्ये मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. यासाठी जरांगे पाटील यांच्या बैठका होत आहेत. अशातचं आता बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. जालन्यातून बीड दौऱ्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.
29 ऑगस्टला मुंबईत जाणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आमरण उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.