
Marathwada Farmer (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यंदा पावसाची जोरदार हजेरी लावली.
मराठवाड्यात पावसाअभावी खरीप हंगामावर विशेष परिणाम
आत्तापर्यंत फक्त 64 टक्के पेरण्या पूर्ण
राज्यात यंदाच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. मात्र काही असे भाग आहेत जिथे पुरेसा पाऊस पडला नाही, पावसाची अजूनही प्रतिक्षा कायम आहे. मुंबई, पुणे, सातारा अशा भागांना पावसाने जोडपले. त्यामुळे अनेक शहर, रस्ते सखला भाग पाण्याखाली गेले. पण दुसरीकडे चित्र काही वेगळ पाहायला मिळत आहे. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसले आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 64 टक्के पेरण्या पूर्ण
विशेष सांगण्याचं झालं तर मराठवाड्यात पावसाअभावी खरीप हंगामावर विशेष परिणाम पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागात आत्तापर्यंत फक्त 64 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतांमध्ये अजूनही मशागत करुन पावसाची वाट पाहत आहेत. पीकाला आवश्यक असणारा योग्य ओलावा नसल्याने पेरणी पुढे ढकलण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या करण्याचे सल्ले
हवामान विभागाकडून तसेच कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या करण्याचे सल्ले देण्यात आले होते. कमी पावसात घाईने पेरणी केली तर बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सावधान भूमिका घेतली आहे. मात्र पावसाची वाट पाहता आणि वाढता विलंब लक्षात घेता चिंता अधिक गडद होत गेली.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी याचवेळी 91 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पावसावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट येऊन उभे राहिले आहे. पावसाने असाच विलंब केला तर, नक्कीच खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाचेही लक्ष आता येत्या पावसाकडे लागले आहे.
Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?