Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार महायुतीत आल्यामुळे…; मंत्री दिपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय, पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरुन आता दिपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2024 | 12:02 PM
अजित पवार महायुतीत आल्यामुळे…; मंत्री दिपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

पुणे : मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता मंत्री दिपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अजित पवार हे एक कार्यक्षम मंत्री असून त्यांच्या येण्याने महाराष्ट्राला लाभ झालेला आहे. राज्याच्या विकासाला गती देखील प्राप्त झाली आहे, असे केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना नमूद केले. राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय, पण बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावरुन आता दिपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

पुण्यात मॉर्डन कॉलेज येथे रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री केसरकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘महायुतीत काेणताही वाद नकाे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना बोलावले असावे. कोणाच्याही वक्तव्याने महायुतीत प्रॉब्लेम नको हेच मुख्यमंत्री सांगत असतात आणि याचाच पालन आम्ही करत असतो. महायुतीच्या माध्यमातून राज्यात जी प्रगती सुरू आहे ती अशीच पुढे कायम ठेवायची आहे.’’

‘मालवण येथे भव्य पुतळा बसविला जाईल’

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काेसळल्याबाबत केसरकर म्हणाले की, ‘‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा बसविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी एक दाेन बैठकाही घेतल्या आहेत. या बैठकीत अधिकारी आणि प्रसिद्ध शिल्पकारही उपस्थित हाेते. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, मालवण येथे भव्य आणइ दिव्य असा पुतळा बसविला जाईल.’’

Web Title: Minister deepak kesarkar reacted to tanaji sawants statement nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 12:02 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.