
mira bhayander fire
घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग विझविण्याचे काम काही तास सुरू होते. सुदैवाने जीवितहानी टळल्याची माहिती समोर येत असली, तरी काहींना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्तात ठेवला.
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे चिंता वाढली
गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर शहरात अतिक्रमण करून उभारलेल्या झोपड्या, तात्पुरत्या शेड्स व अनधिकृत बांधकामांमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. प्रत्येक घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mira Bhayander : घराच्या समोरचं भरधाव वाहनाने तरुणाला चिरडलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार
पूर्वीच दिलेल्या लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष
रामदेव पार्क परिसरातील परिस्थितीबाबत मेडतिया रविराज ‘ए’ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (भाईंदर पूर्व) यांनी दिनांक 9 मार्च 2026 रोजी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत गंभीर तक्रारी केल्या होत्या. या निवेदनात अतिक्रमण करून राहणाऱ्या काही लोकांकडून परिसरात असामाजिक कृत्ये सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते.
सोसायटीच्या निवेदनानुसार, झोपडपट्टीत राहणाऱ्या काही व्यक्तींकडून दारू पिणे, भांडणे, शिवीगाळ असे प्रकार नियमित सुरू होते.दिनांक 4 मार्च 2026 रोजी एका तरुणावर 8 ते 10 जणांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची नोंद नवघर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.अरुंद रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केल्याने नागरिकांना, विशेषतः महिला व ज्येष्ठांना ये-जा करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका संभवतो, असा स्पष्ट इशारा देत अतिक्रमण हटवून संबंधितांचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीनंतरही महापालिकेकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांचा संताप; निष्काळजीपणाचा आरोप
आज घडलेली आग ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “घटना घडल्यावरच प्रशासन जागे होते. दोन दिवस कारवाई करून पुन्हा सर्व काही पूर्ववत होते,” असा संतप्त सूर स्थानिकांनी व्यक्त केला. अतिक्रमण माफियांना रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
अतिक्रमण माफियांचे जाळे सक्रिय?
कारवाईनंतर काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा झोपड्या उभ्या राहत असल्याने शहरात अतिक्रमण माफियांचे संघटित जाळे कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटना घडू शकतात, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.
प्रशासनाकडे नागरिकांच्या ठोस मागण्या
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
यादरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किट, गॅस गळती किंवा अन्य कारणांचा तपास सुरू आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा याबाबत अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे मीरा-भाईंदरमधील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, आता तरी महापालिका प्रशासन ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.