मुंबई: Ahmedabad Plane Crash: काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान या घटनेवर आमदार दिलीप लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबाद येथील घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी भीती व्यक्त केली आहे.
अहमदाबादच्या घटनेवरून आमदार दिलीप लांडे म्हणाले, जर का अहमदाबादसारखी घटना जर मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते असे आमदार दिलीप लांडे म्हणाले आहेत. मुंबई विमानतळाच्या जवळपास मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. अहमदाबादसारखी घटना या परिसरात घडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. जीवितहानी होऊ शकते.
कुर्ला बैल बाजार हा झोपडपट्टी परिसर मुंबई विमानतळाच्या जवळच आहे. विमान उड्डाण घेतात तेव्हा या भागाच्या कमी उंचीवर उड्डाण घेत असतात. त्यामुळे कोणती घटना इथे घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते अशी भीती आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबतचा प्रश्न मी विधानसभेत मांडला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. ही झोपडपट्टी या ठिकानवरूनळवकरत लवकर हटवली गेली पाहिजे. अहमदाबादसारखी घटना होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने ही झोपडपट्टी लवकर हटवावी अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे.
मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले
मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार२४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.
Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?
संबंधित विमान नेमके माघारी का परतले, याबाबत एअर इंडियाने अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तांत्रिक बिघाड, वैमानिकांच्या सूचनांनुसार घेतलेला निर्णय, किंवा अन्य कोणताही धोका यामागे असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली आहे.अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातानंतर एअर इंडियाने सावधगिरीचा उपाय म्हणून काही उड्डाणे वळवण्याचा किंवा मूळ स्थानकांकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.