Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संजय राऊत हे आगलावे, महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं एक कार्ट’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली टीका

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना-भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले होते. सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2023 | 07:12 PM
‘संजय राऊत हे आगलावे, महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं एक कार्ट’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने केली टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेना-भाजप सरकारचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याची टीका केली. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले होते. सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत हे आगलावे आहेत. ते टेंभा घेऊन महाराष्ट्रात आग लावत फिरतात’, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

कोल्हापुरातील एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यांनी राज्यातील विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाला. भाजपच्या आमदारांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं. त्यात आता शहाजीबापू पाटील यांनी म्हटले की, ‘संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका’.

संजय राऊत-सुनील राऊतांना म्हणाले काळू बाळू

संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांच्याबाबत विचारले असता त्यांनी या दोन्ही बंधूंचा उल्लेख काळूबाळू असा केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘एकाच आई-बापाची दोन पोरं सारखीच असतात. ते काळू बाळू आहेत.’

काय म्हणाले संजय राऊत?

विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचा मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पद आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे यांनी दिली ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पद गेली तर पदं परत येतील. पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. या विधानाचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर विधान परिषदेतही या विधानाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला.

Web Title: Mla shahjibapu patil criticizes on mp sanjay raut in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2023 | 07:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • MP Sanjay Raut
  • political news
  • sanjay raut
  • Shahjibapu Patil
  • shivsena

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.