रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल
Mumbai News: राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यसेवेचा विस्तारही त्याच वेगाने झाला आहे का, असा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारी रुग्णालयांतील ओपीडी तिप्पट वाढणे ही एका बाजूला नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील वाढता विश्वास दर्शविणारी बाब असली, तरी दुसऱ्या बाजूला उपलब्ध डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, खाटा आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताणही यातून स्पष्ट होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारित जिल्हा रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि ट्रॉमा केअर सेंटर अशी एकूण ६११ रुग्णालये व केंद्रे असून, त्यामध्ये एकूण २९ हजार ५३४ खाटा उपलब्ध आहेत.(फोटो सौजन्य – AI)
रुग्णसंख्या वाढताना औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा तपासण्या, क्ष-किरण व इतर निदान सुविधा आणि खाटांची क्षमता यांचा विस्तारही आवश्यक आहे. माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या मते, सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी वाढ ही केवळ आरोग्यसेवेची उपलब्धता वाढल्याचे लक्षण म्हणून पाहून चालणार नाही. वाढत्या रुग्णभाराला तोंड देण्यासाठी आवश्यक डॉक्टर, मनुष्यबळ, खाटा आणि उपचारक्षमतेत किती वाढ झाली, याचा आढावा घेण्याची वेळ आल्याचे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले, यामध्ये २० जिल्हा रुग्णालयांत ५ हजार १२७ खाटा, २४ स्त्री रुग्णालयांत ३ हजार ५ खाटा, ३३ शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत ३ हजार ३०० खाटा, तर ७३ पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत ३ हजार ६५० खाटा आहेत. राज्यातील ३७३ ग्रामीण रुग्णालयांमध्ये ११ हजार १९० खाटा असून, ७८ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १ हजार ५६० खाटांची व्यवस्था आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून १०६ उपजिल्हा रुग्णालये उभारण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये संदर्भित रुग्णांवर उपचार आणि विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, ओपीडीचा रुग्णभार तिप्पट वाढला असेल, तर त्या प्रमाणात डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
66 ‘लोकसंख्येच्या संख्या, खाटा प्रमाणात आणि आरोग्य मनुष्यबळ संस्थांची वाढविण्यासोबतच आरोग्य योजनांमध्ये खासगी क्षेत्राचा अधिक व्यापक सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची केवळ ओपीडी वाढवून प्रगती मोजता येणार नाही; त्यासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि उपचारक्षमता यांचा समतोल वाढविणे तितकेच महत्वाचे आहे, अशी माहिती – डॉ. सुभाष साळुंखे, माजी आरोग्य यांनी दिली आहे.






