Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India : साडेसाती संपेना! मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले, टायर फुटले; इंजिनलाही नुकसान

Air India Plane : एअर इंडियाची साडेसाती संपायचं नाव घेत नाही. आज पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान मुंबईतील धावपट्टीवर घसरले. पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केलं, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 21, 2025 | 02:46 PM
मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले (फोटो सौजन्य-X)

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे विमान घसरले (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Air India Plane News Marathi: काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने जात होते. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. हे विमान लोकवस्ती असलेल्या मेडीकल कॉलेजच्या एका मेसवर पडलं. ज्यात विमानातील प्रवाशी, केबीन क्रू आणि मेसमध्ये जेवण करणारे काही विद्यार्थी असे मिळून एकूण २६० जणांचा मृत्यू झाला. अपघताची ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला आहे.

“सूरज चव्हाण यांना समज दिली…; छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान सोमवारी (21 जुलै) सकाळी लँडिंग दरम्यान घसरले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि लँडिंग दरम्यान विमान घसरले. यामुळे विमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि त्याचे तीन टायर फुटले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा अपघात खराब हवामानामुळे झाला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमानाचे तीन टायर फुटले आणि विमानाच्या इंजिनला नुकसानही झाले. मात्र पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत विमान कंट्रोल केलं, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.

याप्रकरणी एअर इंडियाने एक निवेदन देखील जारी केले आहे. एअरलाइन कंपनीने म्हटले आहे की, ‘२१ जुलै २०२५ रोजी कोचीहून मुंबईला जाणारे विमान AI2744 लँडिंग दरम्यान घसरले. याचे कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे घसरले झालेली. विमान सुरक्षित गेटवर उतरले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरळीतपणे उतरले. सध्या विमानाला तपासणीसाठी हवाई प्रवासातून काढून टाकण्यात आले आहे. प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.’ या घटनेमुळे विमानतळावर काही काळ गोंधळ उडाला. विमानतळ प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसाद पथकालाही बोलावले.

छत्रपती शिवाजी विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. धावपट्टीवरील या घटनेनंतर लगेचच आपत्कालीन पथक सक्रिय करण्यात आले आणि परिस्थिती हाताळण्यात आली. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमानतळाच्या धावपट्टीला थोडे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, दुसरी धावपट्टी त्वरित सक्रिय करण्यात आली आहे. ०९/२७ हा मुंबई विमानतळाचा मुख्य धावपट्टी आहे. आता १४/३२ त्याच्या जागी सक्रिय करण्यात आला आहे. सध्या, विमान उड्डाण सेवांमधून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याची तपासणी केली जात आहे. संपूर्ण तपासणीनंतरच ते परत आणले जाईल.

 केडीएमसी म्हणजे रोगराईचा हॉटस्पॉट; परिसरात घाणीचं सम्राज्य मात्र पालिका मूग गिळून गप्प

Web Title: Air india reacts as flight overshoots runway during touchdown in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • air india
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
1

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.