Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अभाविपने मुंबई विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आहे. मार्चमध्ये निवेदन देऊनही समस्या कायम असल्याचा आरोप करत कायमस्वरूपी उपाय आणि तक्रारदार विद्यार्थिनींच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 08:43 PM
मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मुंबई विद्यापीठाच्या मरिन ड्राइव्ह, चर्चगेट येथील मादाम कामा महिला वसतिगृहातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजांबाबत विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थिनींना दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या स्वच्छता, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर होत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

विशेष म्हणजे, मार्च महिन्यातच संबंधित मुख्य वसतिगृह अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्याच्या तांत्रिक अडचणीपुरता मर्यादित राहिलेला नसून, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले आहे.

विद्यार्थिनींना पाणी, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधांसाठी प्रशासनाच्या दारात वारंवार धाव घ्यावी लागणे ही विद्यापीठासाठी गंभीर बाब आहे. विद्यार्थिनींनी तक्रार करायची, निवेदन द्यायचे आणि प्रशासनाने केवळ आश्वासने देत वेळकाढूपणा करायचा, ही कार्यपद्धती आता चालणार नसल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.

“प्रशासनाने विद्यार्थिनींच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये!”

“पाणी ही ऐच्छिक सुविधा नसून प्रत्येक विद्यार्थिनीची मूलभूत गरज आणि प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मार्चपासून समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा निघत नसेल, तर संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. विद्यार्थिनींच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका अभाविपने घेतली आहे.

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

अभाविपच्या ठोस मागण्या

१. तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीपुरवठ्याची तातडीने उच्चस्तरीय पाहणी करून समस्या नेमकी कोणत्या कारणामुळे उद्भवत आहे, याचा अहवाल तयार करावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना त्वरित लागू करावी.

२. जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी

विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधित वसतिगृह अधीक्षक व जबाबदार कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष निश्चित करावा आणि नियमानुसार कठोर कारवाई करावी.

३. मूलभूत सुविधांसाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करावा

पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधांची नियमित तपासणी करण्यासाठी विशिष्ट जबाबदार अधिकारी नियुक्त करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी.

४. सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करावी

विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अधिकृत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देत प्रत्येक तक्रारीची नोंद, कार्यवाही आणि निवारणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी.

५. प्रशासनाने लेखी उत्तर द्यावे

मार्चपासून करण्यात आलेल्या तक्रारींवर आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली, याची लेखी माहिती विद्यार्थिनी तसेच अभाविपला द्यावी.

६. तक्रारदार विद्यार्थिनींवर कोणताही दबाव आणू नये

समस्या मांडणाऱ्या विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव, शैक्षणिक नुकसान किंवा वसतिगृहातील प्रवेशाबाबत प्रतिकूल कारवाई केली जाऊ नये. अशा प्रकारच्या तक्रारींची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी.

तक्रार मांडणाऱ्या विद्यार्थिनींनाच धमकी?

या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे, वसतिगृहातील समस्या अभाविपच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे वसतिगृह प्रशासनाकडून आपले वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची थेट धमकी मिळाल्याचे संबंधित विद्यार्थिनीने सांगितले आहे. या प्रकारामुळे भीतीच्या वातावरणात संबंधित विद्यार्थिनीने आपली ओळख उघड करण्यास नकार दिला आहे.

विद्यार्थिनींच्या अडचणी मांडणे हा गुन्हा नाही; आपल्या मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवणे हा त्यांचा अधिकार आहे. समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या विद्यार्थिनींनाच वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जात असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थिनींच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी दडपशाही किंवा धमकीच्या माध्यमातून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर अभाविप हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. संबंधित विद्यार्थिनीला कोणत्याही प्रकारचा त्रास, दबाव किंवा शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची प्रशासनाने खात्री करावी.

“समस्या मांडणाऱ्या विद्यार्थिनींचा आवाज दाबण्याऐवजी समस्या सोडवा. धमकीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना गप्प करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवा; अन्यथा अभाविप याविरोधात अधिक तीव्र भूमिका घेईल,” असा इशारा अभाविपने दिला आहे.

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

आश्वासन नको, कृती हवी!

विद्यार्थिनींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही विद्यापीठ प्रशासनाची कृपा नसून कर्तव्य आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना नियमित पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल आणि समस्या मांडणाऱ्या विद्यार्थिनींनाच प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जात असेल, तर हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा विषय राहिलेला नाही; हा विद्यार्थिनींच्या अधिकारांशी संबंधित गंभीर प्रश्न आहे.

मार्चमध्ये निवेदन देऊनही प्रश्न कायम असेल, तर आता प्रशासनाने कारणे सांगण्याऐवजी कृती दाखवावी. विद्यार्थिनींच्या संयमाची परीक्षा घेणे थांबवून त्यांच्या मूलभूत गरजांची तातडीने पूर्तता करावी.

संबधित मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी न केल्यास अभाविप विद्यार्थिनींच्या न्याय्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारेल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी मुंबई विद्यापीठ प्रशासनाची राहील, असे सांगण्यात आले.

Web Title: Cama womens hostel water issue mumbai university abvp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • ABVP
  • Mumbai University
  • Student Protest

संबंधित बातम्या

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर
1

Mumbai University : अपार आयडीशिवाय हॉलतिकीट नाही; १९-२० ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचे विशेष शिबिर

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
2

Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या केंद्रीय कार्यालयात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

‘अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या’; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, ‘शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी
4

‘अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या’; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, ‘शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.