संग्रहित फोटो
मुंबईतील टँकर लॉबीवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, पाणी टंचाई असतानाही टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोच कसा या टँकरला पाणी मिळते कोठून? म्हणूनच तर शंका बळावते की टँकर लॉबी कोण आहे? या टँकर लॉबीचे मालक कोण आहेत? काही नगरसेवक आहेत का? नगरसेवकांच्या जवळचे कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांचे नातेवाईक आहेत का? हे सत्य पुढे आले पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
सरकार चौकशी वगैरे काही करत नाहीच पण निदान सत्य तरी पुढे आणा की हे टँकर कोणाचे आहेत आणि ते टँकरचे ज्यांचे आहेत, त्यांचे आणि नगरसेवकांचे लागेबांधे काय आहेत? मुंबईकरांना याचे उत्तर हवे आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन, बीएमसी आयुक्त व राज्य सरकार यांनी या टँकर लॉबीवर सविस्तर खुलासा करावा, असेही काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. लोढे यांच्या प्रश्नांवर मुंबई महानगरपालिका प्रशासन, बीएमसी आयुक्त व राज्य सरकार काय उत्तर देणार हेही पाहणं महत्वाच ठरणार आहे.






