...तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
Manoj Jarange Patil on Eknath Shinde: “जर ५८ लाख नोंदी सापडल्या नसतील, तर एकनाथ शिंदे यांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी नोंदी सापडलेल्या नाहीत असे स्पष्ट करावे. एकनाथ शिंदेंनीही त्यांनी आम्हाला फसवले नाही ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, असे स्पष्ट करावे,” अशी मागणी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर सरकारने या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज शिंदेंना संपवून टाकेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. खास बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सांगण्यावरून उपोषण करत असल्याचा आरोप केला जात होता. पण जरांगे पाटील यांनी यावेळी थेट एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“पक्षाशी ज्या पद्धतीने गद्दारी केली, तशी आमच्याशी गद्दारी का केली?” असा सवाल मराठे विचारतील. शिंदेंच्या लाखोंच्या सभा होत होत्या. मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठ्या सभा होत होत्या. मात्र, सगळे कुठे नेऊन ठेवले? मराठ्यांच्या विरोधात गेल्यानंतर काय होते, ते पाहा,” असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यावर टिका करत जरांगे पाटील म्हणाले की, ” आधी शिंदे यांनी परभणी दौरा रद्द केला होता. मात्र, काही वेळानंतर एका अधिकाऱ्याने ‘जरांगे पाटलांनी सूट दिल्याचा संदेश दिल्यानंतर त्यांनी दौरा केला. पण आम्ही भिडलो असतो तर शिंदे साहेबांना पळायलाही जागा राहिली नसती,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतां
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेची दारे खुली असल्याच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “आम्हाला तुमच्याकडे यायचे आहे, असे आम्ही म्हटलेले नाही. आम्ही तुम्हाला मोजत नाही, आम्ही मोकळे आहोत. संवैधानिक’ या शब्दाच्या वापरावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. “संवैधानिक म्हणजे काय, ते त्यांनाच माहिती असेल. जे भ्रष्ट लोक आहेत, ते भाजपमध्ये आहेत ते संवैधानिक आहेत; ज्यांच्यावर आरोप नाहीत, ते जेलमध्ये आहेत. त्यांच्यासाठी दोन संविधानिक असतात,” असा आरोप जरांगे यांनी केला.






