
फोटो सौजन्य: @CMOMaharashtra/ X.com
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा मुंबईतील लोकभवन येथे पार पडला, त्यावेळी सी.पी.राधाकृष्णन म्हणून बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
तरुणांना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, “उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाचा वाटा भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्यात मोठा असेल.” तसेच त्यांनी भारतीय तरुणांना जपानी लोकांप्रमाणे कामाप्रती निष्ठा आणि शिस्त अंगीकारण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘एआय लिविंग लॅब’ उपक्रमाचे कौतुक केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. “महाराष्ट्र हे स्टार्ट-अप्स आणि युनिकॉर्नमध्ये देशात आघाडीवर आहे. भविष्यात आपण युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने १०,००० महिलांना एआय प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांनी नाविन्यता आणि प्रयोगशीलता जपण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नमूद केले की, प्राचीन काळी भारत प्रत्येक घरातील कौशल्यामुळेच ‘सोने की चिडिया’ होता, तीच परंपरा आपल्याला पुन्हा उभी करायची आहे.
कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पहिल्याच दीक्षांत सोहळ्यात २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रे व पदव्या प्राप्त केल्या आहेत. विद्यापीठाने जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्समधील जागतिक संस्थांशी करार केले असून ७०० विद्यार्थ्यांना परदेशात रोजगारक्षम बनवण्यात येत आहे.
या सोहळ्यात ६ सुवर्णपदक विजेत्यांचा आणि राज्यातील उत्कृष्ट आयटीआय (ITI) संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शेवटी, ‘जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शना’चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले.