
उकाड्यानंतर पावसाची हजेरी; मुंबई उपनगरात रिमझिम पावसाने वातावरण आल्हाददायक (फोटो सौजन्य-ChatGPT)
विशेषतः मुंबई उपनगरातील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे उष्णता कमी झाली असून नागरिकांनीही काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदारांसह स्थानिक नागरिकांना या पावसामुळे उकाड्यापासून तात्पुरता आराम मिळाला.
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस…
दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्री-मान्सून हालचालींना वेग आल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही भागांत अजूनही उष्णता आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी हा पाऊस उकाड्यातील दिलासा ठरला असला तरी आगामी मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे, विदर्भ प्रदेशात भट्टीप्रमाणे तप्त वातावरण असून, कमाल तापमानाचे सर्व विक्रम मोडले जात आहेत. दरम्यान, सक्रिय मान्सून वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, राज्यात हे आश्चर्यकारक मिश्र हवामान पुढील पाच दिवस सुरू राहील.
हवामान विभागाने २२ ते २४ मे दरम्यान उष्णता थोडी कमी होईल, परंतु ‘ऑरेंज अलर्ट’ कायम राहील. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पुढील चार ते पाच दिवस तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लोकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.
विदर्भात आधीच प्रचंड उष्णता असताना, मान्सूनच्या वाऱ्यांच्या आगमनाने अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. हवामान विभागाने ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या इशाऱ्यासह ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. २१ मे रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहील.