
धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त
Purandar Airport News: पुरंदर विमानतळाचा ‘टेक-ऑफ’ सुसाट! ६३७ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी
वसई-विरार शहर महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी या संदर्भात शहरातील एक्यूआयवर चिंता व्यक्त केली होती. परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे आहे. महामार्गालगत वसलेली आरएमसी संयंत्रे असोत, किंवा मग गोखिवरे डम्पिंग ग्राउंड-रात्र होताच, हे संपूर्ण परिसर पांढऱ्या धुराच्या दाट लोटांनी वेढले जातात. हा धूर केवळ दृश्यमानताच कमी करत नाही, तर वसई-विरारच्या रहिवाशांच्या फुफ्फुसांवर थेट हल्ललाही चढवत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
महामार्गालगत असलेल्या प्रकल्पांना प्रदूषण नियंत्रणासंदर्भात कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या प्रकल्पांमध्ये ‘स्क्रबर सिस्टीम’ (प्रदूषण निवारण यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आणि रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने प्रदूषण करताना आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- आनंद काटोळे, अधिकारी, ठाणे-पालघर प्रदूषण नियंत्रण मंडळ
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हे प्रकल्प चालक निर्धास्तपणे आणि कोणाचीही भीती न बाळगता वागत आहेत. संबंधित विभागाने केवळ नोटिसा बजावण्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता, रात्रीच्या वेळी अचानक तपासण्या कराव्यात आणि प्रदूषण करणाऱ्या या प्रकल्यांचे काम त्वरित बंद पाडावे.- अनिल चौहान, स्थानिक रहिवासी
रस्ते बांधकाम आणि विकास प्रकल्पांच्या नावाखाली, डांबराची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत, अनेक प्रकल्प चालक कोणत्याही प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवल्याशिवायच आपले प्रकल्प चालवत आहेत. औद्योगिक प्रक्रियेदरम्यान उत्सर्जित होणाऱ्या घातक वायूंचे नियंत्रण करण्यासाठी ‘स्क्रबर यंत्रणा’ बसवणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. असे असूनही, अनेक प्रकल्प चालक, खर्च वाचवण्याच्या उद्देशाने विषारी वायू थेट वातावरणात सोडत आहेत.