
मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच
सिडकोमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! विजय सिंघल यांची बदली; अश्विन मुद्गल नवे व्यवस्थापकीय संचालक
मुंबईतील एफ-दक्षिण (परळ-शिवडी) आणि एफ-उत्तर (माटुंगा-सायन) हे विभाग भौगोलिकदृष्ट्या सखल भागात येत असल्याने मुसळधार पावसात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. शहरातील कचरा आणि प्लास्टिक पाण्याच्या प्रवाहासोबत – वाहून आल्यामुळे रेल्वे रुळांखालील कल्व्हर्ट्स आणि पाण्याचा निचरा करणारी मुख्य आउटफॉल्सची तोंडे पूर्णपणे बंद – (ब्लॉक) होतात. परिणामी, पाण्याचा निचरा थांबून साचलेले पाणी थेट रेल्वे रुळांवर येते आणि मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प होते. हीच समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी पालिकेने आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
रेल्वे कल्व्हर्ट्सवर या मजबूत लोखंडी जाळ्या बसवल्यामुळे कचरा आणि प्लास्टिक पाण्याचा प्रवाहासोबत पुढे वाहून जाणार नाही, तो जाळीपाशीच अडवला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अखंड सुरू राहणार असून रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा धोका टळणार आहे. परिणामी याचा थेट फायदा मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार असून, यंदा लोकल खोळवण्याची भीती कमी होणार आहे.
पावसाळा अगदी तोंडावर असल्याने पालिकेने कंत्राटदाराला हे काम अत्यंत कमी कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सध्या नियोजित स्थळावर काम वेगाने सुरू असून, पर्जन्यजल वाहिन्या कार्यशाळा विभागाचे अधिकारी यावर थेट देखरेख ठेवून आहेत. पालिकेच्या या तत्परतेमुळे यंदाच्या पावसाळ्यात मध्य आणि हार्बर रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होईल, अशी आशा मुंबईकरांना आहे.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास